हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pahalgam Terrorist Attack – जम्मू-काश्मीरच्या पहलगाम परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यात 28 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भयानक घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात (Pahalgam Terrorist Attack) नवविवाहित जोडप्यालाही लक्ष्य करण्यात आलं. लग्नानंतर जम्मूमध्ये फिरायला आलेल्या या जोडप्यापैकी पतीचा हल्ल्यात मृत्यू झाला.
मुस्लिम नसल्याचं सांगितल्यामुळे गोळ्या झाडल्या (Pahalgam Terrorist Attack) –
दहशतवाद्यांनी पोलिसांच्या वेषात येत, पर्यटकांना थांबवून त्यांची नावे अन धर्म विचारत गोळीबार केला. या अमानवी हल्ल्यात नवविवाहित जोडप्यालाही (नौदलाचे अधिकारी विनय नरवाल आणि हिमानी ) लक्ष्य करण्यात आले. लग्नानंतर जम्मूमध्ये फिरायला आलेल्या या जोडप्यापैकी पतीचा (नौदलाचे अधिकारी विनय नरवाल) हल्ल्यात मृत्यू झाला. पत्नीने उपस्थितांना मदतीसाठी विनंती ,विनवणी केली, पण तिचे प्रयत्न निष्फळ ठरले. कोणीही मदतीसाठी येईना हे बघून ती आपल्या पतीजवळ शांत बसली. महिलेच्या सांगण्यानुसार, दहशतवाद्यांनी तिच्या पतीला केवळ मुस्लिम नसल्याचं सांगितल्यामुळे गोळ्या झाडल्या.
महाराष्ट्रातील चार पर्यटक जखमी –
या हल्ल्यात (Pahalgam Terrorist Attack) महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे. सध्या उपलब्ध माहितीनुसार, महाराष्ट्रातील चार पर्यटक जखमी झाले असून त्यापैकी माणिक पाटील आणि एस. भालचंद्र या पुण्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
हल्ल्याची जबाबदारी (Pahalgam Terrorist Attack) –
हल्ल्याची जबाबदारी The Resistance Front (TRF) या दहशतवादी संघटनेवर असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुरक्षा दलाकडून परिसरात सघन शोधमोहीम राबवण्यात येत आहे. सीआरपीएफची क्विक रिअक्शन टीम घटनास्थळी दाखल झाली असून, पोलीस युनिफॉर्ममध्ये असलेल्या दहशतवाद्यांचा माग काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.या हल्ल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक नेत्यांनी हल्ल्याचा निषेध करत केंद्र सरकारकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे.