Pahalgam Terrorist Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर राज ठाकरे संतप्त; केंद्राला केली ‘हि’ विंनती

_Pahalgam Terrorist Attack (1)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pahalgam Terrorist Attack – जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन घाटी भागात मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात हळहळ अन संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष घटनेनंतर (Pahalgam Terrorist Attack) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया दिली असून, केंद्र सरकारने आता “दहशतवाद्यांच्या पुढच्या 10 पिढ्याही थरकून जातील असा बंदोबस्त करावा,” अशी मागणी केली असून, या घटनेबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

दहशतवाद्यांनी धर्म विचारून निशाणा साधला (Pahalgam Terrorist Attack) –

मिळालेल्या माहितीनुसार, 8 ते 10 दहशतवाद्यांनी पोलिसांच्या वेशात येऊन 40 पर्यटकांना घेरले अन त्यांची नावे विचारून विशिष्ट धर्मीयांवर बेछूट गोळीबार केला. प्रत्यक्षदर्शी महिला म्हणाल्या की, “दहशतवाद्यांनी धर्म विचारून निशाणा साधला.” या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया –

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटलं आहे की, “1972 मध्ये म्युनिक ऑलिम्पिकदरम्यान इस्रायली खेळाडूंवर झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने अतिरेक्यांचा ज्या पद्धतीने खात्मा केला, तशीच ठोस कारवाई भारत सरकारने करावी. भारत अन इस्रायलचे संबंध उत्तम आहेत, त्यामुळे केंद्र सरकारने त्याच पद्धतीने या दहशतवाद्यांना (Pahalgam Terrorist Attack) आणि त्यांच्या समर्थकांना कायमचा संपवावं.”

राज ठाकरेंनी हल्ल्यातील ठार झालेल्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “या देशातील हिंदूंवर कोणीही हल्ला करेल, तर आम्ही एकत्र येऊन त्याचा सामना करू.”

नवनिर्माण सेना नक्कीच सरकारच्या पाठीशी –

राज ठाकरेंनी केंद्र सरकारला प्रश्न विचारत म्हटलं की, “370 कलम हटवल्यानंतर परिस्थिती सुधारतेय असं वाटत असतानाच असा हल्ला होणं गंभीर आहे. भविष्यात पर्यटक, गुंतवणूकदार काश्मीरकडे कसे पाहतील?” “सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा. बाकीच्यांचं माहित नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्कीच सरकारच्या पाठीशी उभी राहील.”