PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आज जमा होणार किसान सन्मान योजनेच्या 13 व्या हप्त्याचे पैसे !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशातील शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा आणि त्यांचे समृद्ध व्हावे यासाठी मोदी सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेचा 13 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी या हप्त्याकडे डोळे लावून बसला होता.

पीएम किसान योजनेअंतर्गत कर्नाटकमधील बेळगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमा दरम्यान किसान सन्मान योजनेच्या 13 व्या टप्प्यातील 16 हजार कोटींच्या अनुदानाचे वितरण केले जाणार आहे. कोरोना संकटात शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू झाली असून आतापर्यंत 12 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा झाले आहेत.

13 व्या हप्त्यातील 16 हजार कोटींच्या वितरणाचा प्रारंभ बेळगावातून होणार आहे. देशभरातील आठ कोटी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात लाभाची रक्कम थेट जमा केली जाईल. पीएम किसान सन्मान योजनेचा हा 13 वा हप्ता आहे. 1 डिसेंबर 2018 पासून ही योजना सुरू करण्यात आली होती.

शेतकरी मित्रानो, तुम्हालाही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर आणि सरकारच्या अन्य सेवांचा लाभ घ्यायचा असेल तर आजच Hello Krushi हे अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्या. हॅलो कृषी मध्ये पीएम किसान योजनेच्या संबंधित सर्व माहिती तर मिळतेच याशिवाय मोदी सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी अवघ्या काही मिनिटात तुम्ही अर्ज सुद्धा करू शकता. या व्यतिरिक्त हॅलो कृषी अँप मध्ये तुम्हाला सातबारा उतारा, सर्व पिकांचे बाजारभाव, जमीन मोजणी, हवामान अंदाज यांसारख्या सुविधाही मिळतात. महत्त्वाचे म्हणजे 1 रुपया सुद्धा खर्च न करता तुम्हाला या सर्व सुविधांचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोर वर जाऊन Hello Krushi अँप डाउनलोड करा.

Hello Krushi डाउनलोड करण्यासाठी Click Here

दर चार महिन्याला एकदा अशा तीन हप्त्यात हा निधी दिला जातो. बारा हप्ते आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. तेरावा हप्त्याचे 16 हजार कोटी रूपये जमा करण्याच्या योजनेचा बेळगावातून प्रारंभ होणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही मोदी सरकारची अतिशय नावाजलेली योजना म्हणता येईल. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकार कडून करण्यात येते. 2000 रुपयांच्या एकूण 3 हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येते. आत्तापार्यंत या योजनेचा लाभ देशभरातील अनेक शेतकऱ्यांना झाला आहे.