दादा! भाजपाचा उमेदवार म्हणजे पराभव निश्चित, त्याकाळापासून मी मार्गदर्शक आहे – एकनाथ खडसे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव । विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपानं टिकत वाटपात डावल्यानंतर खडसे यांची नाराजी उफाळून आली आहे. आपल्याला तिकीट नाकारण्यामागे राज्यातील भाजप नैतृत्वाचा हात असल्याचा थेट आरोप खडसे यांनी करत राज्यातील नेत्यांना धारेवर धरले होते. त्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देत एकनाथ खडसे यांना पक्षानं भरपूर दिलं आहे, असं सांगत खडसे यांच्याविषयीची यादीच त्यांनी सांगितली होती. त्याचबरोबर खडसे यांनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावं, असं म्हटलं होतं.

चंद्रकांत पाटील यांच्या उत्तरावर आता खडसे यांनी पुन्हा पलटवार केला आहे. एका मुलाखतीत बोलताना खडसे म्हणाले, ”मी मार्गदर्शकाच्या भूमिकेत होतो आणि यापुढेही कायम राहिल. चंद्रकांत पाटील हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाले, तेव्हा त्यांचा पक्षाशी संबंध आला. गेली ४० वर्षे चंद्रकांत पाटील यांचा भाजपाशी संबंध नव्हता. संघाच्या माध्यमातून ते विद्यार्थी परिषदेचं काम करत होते. भाजपाचे जुने नवे कार्यकर्ते त्यांना माहिती नव्हते. ज्या काळात भाजपाच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होत होतं, त्या काळात आम्ही निवडून येत होते,” असं खडसे म्हणाले. “१९८० मध्ये जेव्हा भाजपाचा साधा सरपंचही नव्हता, तेव्हा भाजपातून मी पंचायत समितीचा सदस्य होतो. भाजपाचा माणूस उभा राहिला की, तो हरणार हे निश्चित असायचं, अशा काळापासून मी काम केलं. त्यामुळे आम्ही मार्गदर्शकाच्या भूमिकेत कायम आहोत असं खडसे यांनी आपलं भाजपला दिलेलं योगदान निक्षून सांगितलं.

ते पूढे म्हणाले ”चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थी परिषदेचं इतकं काम केल, तर त्यांनी मेधा कुलकर्णीचं आमदारकीचं तिकीट कापून स्वतः उभं राहायला नको होतं. त्यांनी स्वार्थासाठी मेधा कुलकर्णींचा बळी दिला. तुम्ही जर एवढे मोठे नेते आहात, तर तुम्ही कुठूनही निवडून यायला हवं. कोल्हापूरमधून त्यांनी का नाही निवडणून लढवली?,” असा सवाल करत भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment