जनतेचा नरेंन्द्र मोदींवरचा विश्वास उडाला आहे – राज ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक | ‘मी जिथं जातोय तिथं माझ्या सभांना गर्दी होतेय. ही गर्दी जनतेचा नरेंन्द्र मोदींवरचा विश्वास उडाल्याचं द्योतक आहे. लोकांचा भाजप – शिवसेनेवर विश्वास राहिलेला नाही’ असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप शिवसेनेवर निशाणा साधला. राज सध्या नाशिक दौर्यावर असून आज त्यांचा नाशिक मधील शेवटचा दिवस होता. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘लोकसभा – विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण म्हणजे पायावर कुर्हाड मारुन घेण्यासारखं आहे’ असं मत व्यक्त करत ‘लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होणार नाहीत’ असा दावा राज ठाकरे यांनी यावेळी केला. जर विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या तर भाजपला त्याचा मोठा फटका बसेल असेही ते म्हणाले.

विरोधी पक्ष कधीच निवडणुक जिंकत नसतात तर सत्ताधारी हारत असतात. आणि आजचे सत्ताधारी हारले आहेत. सरकारणे जनतेचा विश्वास गमावला असून त्याचं प्रतिबिंब अागामी लोकसभा निवडणुकीत नक्कीच दिसेल असे मत राज यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान राज यांनी आज नाशिक येथील काळाराम मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले. तसेच चिरंजीव अमित याच्या लग्नाविषयी सर्वांना आमत्रण दिले.

ताज्या घडामोडी आणि  हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी  आजच आमचा  WhatsApp  ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra

Leave a Comment