सैन्याच्या मागे एकत्रीतपणे उभे राहण्याची गरज – शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चांदवड प्रतिनिधी | नुकताच देशातील सैनिकांवर दहशवादी हल्ला झाला. त्यानंतर हवाई दलाने कारवाई करून आतंकवाद्यांचे स्थळ उद्ध्वस्त केले. देशाच्या ऐक्याचा प्रश्न येतो तेव्हा पक्षभेद, राजकारण बाजूस ठेवून सैनिकांना त्यांचा निर्णय घेण्याची मोकळीक देऊन एकत्रितपणे आपण सैन्याच्या मागे उभे राहण्याची गरज आहे’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. चांदवड येथे आयोजित दिंडोरी लोकसभा कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

‘पाच वर्षांच्या काळात सरकारने आश्वासने पूर्ण न केल्याने नुकताच तीन राज्यातील निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. त्या राज्यांमध्ये भाजपाला सत्ता गमवावी लागली. याचा अर्थ वातावरण भाजप विरोधात असून आगामी निवडणुकीत नक्की बदल होईल’ असा विश्वास पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

तसेच राजकिय फायद्यासाठी सध्या युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण केली जात आहे असा आरोपही पवार यांनी भाजप सरकारवर लगावला. ‘शेतकऱ्यांच्या घामाची किंमत देण्याची या सरकारची लायकी नाही त्यामुळे यांना पायउतार करण्याची जबाबदारी तुमची-आमची असल्याचे आवाहन पवार यांनी कार्यकर्तांना केले.

Welcome-Amy-Main1.jpg


दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

लोकसभा निवडणुकीत भाजप उतरवणार या स्टार उमेदवारांना रिंगणात

इथून लढवू शकतात रोहित पवार विधानसभा निवडणूक

आधी लोकसभा निवडणूक जिंका, नंतर पंतप्रधान शोधा – शरद पवार

रोहित पवार आगामी लोकसभेत शिवसेनेच्या आढळरावांना पुरून उरणार?

शरद पवार पुण्यातून लढवणार लोकसभा

Leave a Comment