…तर 2024 ला नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत पहिले दोन आरोपी असतील; प्रकाश आंबेडकरांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकार घणाघाती टीका केली आहे. मोदी सरकारमधील मंत्रीच सुरक्षित नाहीत. त्यांच्या मनात मुंबईत येण्याची भीती हे. लोकहो तुम्ही 2024 ला सत्ता बदला कारण 2024 हा शेवटचा कालखंड आहे. नरेंद्र मोदी सगळ्यात मोठा चोर आहे. पहिले जे दोन आरोपी असतील ते मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी असतील. आणि 2024 ला लोकही मोदी विरोधात जातील, अशी घणाघाती टीका प्रकाश आंबेडकरांनी केली.

नाशिक येथील ईदगाह मैदानावर वंचित बहुजन आघाडीचा आज बौद्ध धम्म मेळावा पार पडला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी धक्कादायक विधान केले. ते म्हणाले की, माझे एक मित्र आहेत. त्यांना मी लोकसभेत निवडून येण्यासाठी मदत देखील करतो. ते मला म्हणाले, मला भेटायचं आहे. मी म्हणालो मला भेटायला मुंबईला या, तुम्ही मंत्री आहात. ते म्हणाले मी दिल्ली सोडून येऊ शकत नाही. कारण माझ्यावर नजर आहे. जिथे मंत्र्याला स्वातंत्र्य नाही, तिथे तुमचे काय?” आता एक नवीन कायदा यायच्या बेतात आहे, तो म्हणजे moral policing, म्हणजे तुम्ही खाणार काय, जगणार काय याचे अधिकार सरकारकडे जातील. घटनेने दिलेले व्यक्ती स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य राहणार नाही.

2024 हा शेवटचा कालखंड आहे. जर मोदींनी सांगितलं की, राहुल गांधी माझ्या मागे उभे रहा, नाहीतर तुम्हाला जेलमध्ये टाकेल, तर राहुल गांधी त्यांच्या मागे उभे राहतील. कारण त्यांनी व्यवस्थाच तशी केली आहे, माझ्यामागे उभे रहा, नाहीतर जेल मध्ये जा. या ठिकाणचे लढे राजकीय लोकं लढतील, असं समजू नका. हा लढा आपल्यालाच लढावा लागेल. 2024 मध्ये एकतर आपण तरी हारू, नाहीतर ते तरी हारतील, असे आंबेडकर यांनी म्हंटले.