खळबळजनक ! पुणे RTO चा रिक्षाचालकांना मोठा आदेश, 30 मे ही अंतिम मुदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे RTO च्या नव्या आदेशामुळे शहरातील हजारो रिक्षाचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. सरकारी, निमशासकीय, खाजगी नोकरी करणारे तसेच स्वतःचा उद्योग चालवणारे लोक जर रिक्षा परवाने वापरत असतील, तर त्यांनी ते परत करावेत, असा स्पष्ट आदेश पुणे RTO ने दिला आहे. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

तपासणी मोहीम आणि अंतिम मुदत

RTO कडून लवकरच विशेष तपासणी मोहीम हाती घेतली जाणार असून, नियमबाह्य परवाने वापरणाऱ्यांवर थेट मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. 30 मे 2025 ही परवाने परत करण्याची अंतिम मुदत ठरवण्यात आली आहे.

काय आहे नियम?

1988 च्या मोटार वाहन कायद्यानुसार, कोणताही सरकारी, निमशासकीय किंवा खाजगी क्षेत्रात कार्यरत व्यक्ती रिक्षा परवाना घेऊ शकत नाही. परवाना देताना अर्जदारांकडून ‘स्वतः कोणत्याही प्रकारच्या नोकरीत नाही’ याचे प्रतिज्ञापत्र घेतले जाते.

का आली ही वेळ?

  • अनेकांनी नोकरी सांभाळून अर्धवेळ रिक्षा चालवण्याचे प्रमाण वाढवले.
  • काहींनी केवळ व्यवसायिक लाभासाठी परवाने घेतले असल्याच्या तक्रारी समोर आल्या.
  • त्यामुळे गरजू आणि पूर्णवेळ रिक्षा चालकांना संधी मिळत नाही, असे RTO चे म्हणणे आहे.

रिक्षांची वाढती संख्या

2017 मध्ये पुन्हा परवाने वाटप सुरू केल्यापासून पुण्यातील रिक्षा चालकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

  • पुणे शहर: 83,000 हून अधिक रिक्षा
  • पिंपरी-चिंचवड: 40,000 हून अधिक रिक्षा

जर आदेश पाळला नाही तर?

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई होईल. यामध्ये परवाना रद्द, दंड किंवा इतर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.मच्याकडे रिक्षा परवाना आहे आणि तुम्ही नोकरी/उद्योगात असाल? तर 30 मेपूर्वी RTO कार्यालयात परवाना परत करण्याची प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा अडचणीत येऊ शकता.