भारतीय रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीत वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषत: गर्दीच्या काळात लोकमान्य टिळक टर्मिनससारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची मोठी संख्या दिसून येते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे रेल्वेगाड्यांमधील गर्दी कमी होईल आणि प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळेल.
भारतातील रेल्वे जाळ्याच्या सुसंगत आणि योग्य व्यवस्थापनासाठी भारतीय रेल्वे विविध उपाययोजना करत आहे. गाड्यांची क्षमता वाढवण्याचे कार्य सुरू करण्यात आले असून, त्यासाठी विद्यमान गाड्यांमध्ये अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. रेल्वे प्रशासनाने मेल/ एक्सप्रेस गाड्यांच्या रचनांमध्ये सुधारणा केली आहे. यात विशेषत: जनरल आणि नॉन-एसी स्लीपर कोचच्या डब्यांची संख्या वाढवली गेली आहे.
डब्यांची संख्या वाढणार
सध्या, मेल/ एक्सप्रेस गाड्यांमध्ये 22 डब्यांचा वापर होतो, ज्यात 12 जनरल आणि स्लीपर क्लास कोच व 8 एसी कोच असतात. यामुळे मोठ्या प्रमाणात जनरल आणि नॉन-एसी स्लीपर प्रवाशांना अधिक जागा उपलब्ध होईल. रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठी अनारक्षित नॉन-एसी पॅसेंजर गाड्या, मेमू आणि ईएमयू गाड्याही चालवायला सुरूवात केली आहे. यासाठी जवळपास 79,000 डबे वापरले जात आहेत, ज्यामध्ये 70% डबे जनरल आणि स्लीपर क्लाससाठी आणि 30% डबे एसी कोचसाठी आहेत.
तसेच, जास्त मागणी असलेल्या मार्गांवर विद्यमान गाड्यांमध्ये तात्पुरत्या डब्यांचे जोडणी करण्यात आली आहे. 2024-25 आर्थिक वर्षात, 1200 जनरल क्लास डबे मेल/ एक्सप्रेस गाड्यांमध्ये जोडले जातील, तसेच 17,000 स्लीपर डबे नवीन तयार करण्याची योजना आहे.
गर्दीच्या काळात विशेष गाड्या
सण, सुट्ट्या किंवा इतर गर्दीच्या काळात रेल्वे प्रशासन विशेष गाड्या चालवते. महाकुंभ, दुर्गा पूजा, दीपावली आणि उन्हाळी सुट्टीसारख्या प्रमुख कालावधीत विशेष गाड्या सुरू केली जातात, ज्यामुळे प्रवाशांना सुविधा मिळते. 2024 आणि 2025 या काळात 17,340 महाकुंभसंबंधी, 7,990 दुर्गा पूजा/ दीपावलीसाठी, आणि 12,919 उन्हाळी सुट्टीसाठी गाड्या चालवण्यात येणार आहेत. रेल्वे प्रशासनाचे हे निर्णय प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण ठरतील, ज्यामुळे गर्दी कमी होईल आणि प्रवास आणखी सोयीचा होईल.