बाळासाहेबांच्या पोटी असा मुलगा जन्मला हीच मोठी खंत; रामदास कदमांची जोरदार टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्ष शिंदे गटाचा असल्याचे जाहीर केल्यामुळे उद्धव ठाकरे आणि शिंदे गटांमधील वाद आणखीन वाढला आहे. यामध्ये दोन्ही गटातील नेते एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. आता शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी , बाळासाहेब ठाकरे यांच्या (Balasaheb Thackeray) पोटी असा मुलगा जन्माला आला याची खंत वाटते असे म्हणले आहे. यासह त्यांनी इतर मुद्द्यावरून देखील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना डिवचले आहे.

उद्धव ठाकरेंवर टीका करताना रामदास कदम म्हणाले की, “उद्धव ठाकरे सकाळी उठल्यापासून फक्त टीका करण्याचे काम करतात. त्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पोटी असा मुलगा जन्माला आला याची खंत महाराष्ट्राला आहे. आज एकनाथ शिंदेंमुळे ते बाहेर पडले आहेत, कुणी त्यांना विचारणार नाही. त्यावेळी ते बाहेर पडत नव्हते, कुणाला भेटत नव्हते. मुख्यमंत्री झाल्यानंतरही मंत्रालयात जात नव्हते. पण आज एकनाथ शिंदेंनी त्यांना जबरदस्तीने बाहेर पडायला लावलं आहे.”

त्याचबरोबर, “लोकसभेला पुन्हा एकदा मोठ्या फरकाने मोदी पुन्हा पंतप्रधान होतील. पण, माझी एकच खंत आहे की, आम्ही महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी मोदी आणि शाह यांच्या कामावर विश्वास ठेवून आलो आहोत. आमचा विश्वासघात होणार नाही, याची त्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे. सीटींग जागांवरही भाजपची काही मंडळी प्रयत्न करत आहेत. शिवसेना-राष्ट्रवादीच्या जागांवर जबरदस्तीचा प्रयत्न सुरु आहे.” असे रामदास कदम यांनी बोलून दाखवले आहे.