RBI ने ‘या’ बँकेवर लादले निर्बंध, ग्राहक यापुढे ₹ 5,000 पेक्षा जास्त काढू शकणार नाहीत; अधिक तपशील जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सोमवारी महाराष्ट्रातील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेवर व्यवसाय निर्बंध लादले आहेत. याशिवाय, ग्राहकांना 5,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे काढण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. गेल्या काही काळापासून RBI सहकारी बँकांविरोधात कठोर धोरण अवलंबत आहे.

RBI ने सांगितले की,”निर्बंध लागू झाल्यानंतर, 8 नोव्हेंबर 2021 रोजी आपला व्यवसाय संपल्यानंतर बँक नवीन कर्ज देऊ शकणार नाही किंवा RBI च्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही नवीन डिपॉझिट्स स्वीकारू शकणार नाही. तसेच, कोणताही ठेवीदार त्याच्या खात्यातून 5,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढू शकणार नाही.”

RBI काय म्हणाले जाणून घ्या
RBI ने एका निवेदनात म्हटले आहे की, “बँकेची सध्याच्या लिक्विडिटीची स्थिति पाहता, 5,000 रुपयांपेक्षा बचत खाते, चालू खाते किंवा ग्राहकांचे कोणतेही दुसरे खाते यातून 5,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढणे यासाठी परवानगी नाही आहे. मात्र, ज्या ग्राहकांच्या खात्यातून कर्जाचा हप्ता कापला गेला आहे, त्यांना अटींच्या अधीन राहूनच सेटलमेंट करण्याची परवानगी दिली जाऊ शकते.”

RBI ने असेही म्हटले आहे की,”त्यांच्या या निर्बंधांना बँकिंग लायसन्स रद्द करणे म्हणून पाहिले जाऊ नये.” RBI ने म्हटले आहे की,”बँकेची आर्थिक स्थिति सुधारेपर्यंत बँक निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय करत राहील. पुढे, रिझर्व्ह बँक परिस्थितीनुसार वेळोवेळी या सूचनांमध्ये सुधारणा करण्याचा विचार करू शकते.”

‘हे’ निर्बंध 6 महिन्यांच्या कालावधीसाठी लागू राहतील
RBI ने सांगितले की,”हे निर्बंध 8 नोव्हेंबर 2021 रोजी व्यवसाय बंद झाल्यापासून 6 महिन्यांच्या कालावधीसाठी लागू होतील.” काही सूचनांचे पालन न केल्यामुळे सुमारे दोन आठवड्यांपूर्वी RBI ने महाराष्ट्रातील वसई विकास सहकारी बँकेला 90 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. त्याचवेळी सुमारे महिनाभरात RBI ने मुंबईतील अपना सहकारी बँकेला 79 लाख रुपयांचा दंड ठोठावला.

Leave a Comment