राहूल गांधींनी कंबर कसली!! अखेर ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा मार्ग जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या “भारत जोडो न्याय यात्रे”चा मार्ग नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या यात्रेच्या माध्यमातून राहूल गांधी 67 दिवसांत एकूण 6700 किमीहून अधिक अंतर कापणार आहे. राहूल गांधी 14 राज्यांमधून भारत जोडो न्याय यात्रेची परिक्रमा पूर्ण करणार आहे. याबाबतची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली आहे.

राहूल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही (14 जानेवारी ते 20 मार्च कालावधीत चालणार आहे. त्यामुळे ही यात्रा भारत जोडो यात्रेपेक्षा अधिक वेगळी असणार आहे. परंतु या यात्रेमध्ये पायी यात्रेचा मार्ग फार कमी असणार आहे. परंतु बसने जास्तीत जास्त लोकांना भेटण्याची योजना आखण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आपण या यात्रेचा रूट मॅप कसा असेल जाणून घेऊयात.

भारत जोडो न्याय यात्रेचा रूट मॅप

1) मणिपूर – 107 किमी – 4 जिल्हे

2) नागालँड – 257 किमी – 5 जिल्हे

3) आसाम – 833 किमी – 17 जिल्हे

4) अरुणाचल प्रदेश – 55 किमी – 1 जिल्हा

5) मेघालय – 5 किमी – 1 जिल्हा

6) पश्चिम बंगाल – 523 किमी – 7 जिल्हे

7) बिहार – 425 किमी – 7 जिल्हे

8) झारखंड – 804 किमी – 13 जिल्हे

9) ओडिशा – 341 किमी – 4 जिल्हे

10) छत्तीसगड – 536 किमी – 7 जिल्हे

11) उत्तर प्रदेश – 1,074 किमी – 20 जिल्हे

12) मध्य प्रदेश – 698 किमी – 9 जिल्हे

13) राजस्थान – 128 किमी – 2 जिल्हे

14) गुजरात – 445 किमी – 7 जिल्हे

15) महाराष्ट्र – 480 किमी – 6 जिल्हे

भारत जोडो न्याय यात्रेची लांबी 6,700 किमीपेक्षा जास्त आहे. ही यात्रा 67 दिवस चालेल.