पहिली ते आठवीपर्यंतची शाळा शनिवारची “दप्तरविना” भरणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता या विद्यार्थ्यांची नव्या उपक्रमानुसार आठवड्यातील प्रत्येक शनिवारी दप्तराविना शाळा भरणार आहेत. याची अंमलबजावणी 2024-25 या शैक्षणिक वर्षापासूनच होणार आहे. या संबंधित नुकताच आदेश शालेय शिक्षण विभागाने काढला आहे . या निर्णयामुळे पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकदिवस दप्तर न नेताच शाळेत जाता येणार आहे.

सध्याच्या घडीला शालेय शिक्षण विभाग शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांवर मानसिक ताण वाढू नये, याची खबरदारी घेऊन वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून सरकारने सकाळच्या सत्रात भरणाऱ्या शाळांची वेळ बदलली आहे. त्यामुळे लवकर भरणाऱ्या शाळा सकाळी नऊ वाजता भरणार आहेत. त्याचबरोबर आता आठवड्यातील फक्त पाच दिवस म्हणजेच सोमवार ते शुक्रवारपर्यंत विद्यार्थ्यांना पुस्तके धडे देण्यात येणार आहेत. तर शनिवारी दप्तर विना विद्यार्थ्यांना शाळेत बोलवले जाईल.

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातील दर शनिवारी त्यांच्या आवडीच्या विषयांवर शाळा घेतली जाईल. यात कला, खेळ, ऐतिहासिक किंवा प्रेक्षणीय स्थळांना भेटी, स्काऊट गाइड, कथा सांगणे असे विविध उपक्रम राबवले जाते. म्हणजेच आठवड्यातील 2 दिवस अभ्यासापासून विश्रांती घेतल्यानंतर मुले पुन्हा सोमवारी शाळेत येतील. यामुळे विद्यार्थ्यांची शाळेत येण्याची गोडी वाढेल. तसेच त्यांना अभ्यासाचा अधिक ताण जाणवणार नाही. असा विश्वास शालेय विभागाने व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा आठवड्यातील प्रत्येक शनिवारी दप्तराविना भरवली जाईल. हा उपक्रम आनंदी शनिवार या संकल्पनेअंतर्गत राबवला जात आहे. या दिवशी विद्यार्थ्यांना त्यांचे आवडीचे विषय शिकवले जाते. यात स्काऊट गाइड, कला, खेळ, विविध ठिकाणांना भेट देणे अशा सर्व गोष्टींचा समावेश असेल.