सांगोला-मिरज मार्गावर भीषण अपघात, 6 वारकरी जागीच ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – काल गुजरातच्या मोरबी शहरात झुलता पूल नदीत कोसळल्याची घटना ताजी असताना आज महाराष्ट्रात एक मोठी धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सोलापुरात सांगोला-मिरज मार्गावर मोठा भीषण अपघात (accident) झाला आहे. या भीषण अपघातात (accident) 6 वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या अपघाताची (accident) माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही दुर्दैवी घटना सांगोला तालुक्यातील जुनोनी गावानजीक घडली आहे. पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना टेम्पोची जोराची धडक बसल्यामुळे हा अपघात (accident) झाला आहे. हे वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील जठार वाडीचे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे सर्व वारकरी कार्तिक वारीसाठी पंढरपूरला निघाले होते.

या वारकऱ्यांची दिंडी रस्त्याच्या एका कडेने ज्ञानोबा-माऊलीचा जप करत पुढे जात असताना अचानक रस्त्याने जाणारा एक टेम्पो थेट दिंडीत घुसला. या टेम्पोने अनेक वारकऱ्यांना चिरडले. या भीषण अपघातामुळे (accident) परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय