एसटी कर्मचाऱ्यांचा संपामुळे शहरातील स्मार्ट बसही ठप्प

0
37
smart city bus
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – एसटी महामंडळातील कर्मचार्‍यांच्या संपाचा फटका औरंगाबाद स्मार्ट सिटी बस सेवेला ही बसला असून मागील दोन दिवसांपासून शहर बस सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी ला दररोज पावणेतीन लाख रुपयांवर पाणी सोडावे लागत असून, प्रशासनाने बस सेवा सुरू करण्यासाठी पर्यायी व्यवस्थेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रशासनाने जानेवारी 2017 मध्ये 100 बसेस खरेदी केल्या होत्या. शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत असावी या दृष्टीने तत्कालीन आयुक्तांनी एसटी महामंडळ सोबत मनुष्यबळासाठी करार केला. पाच वर्षे मनुष्य बळ देण्यासाठी एसटी महामंडळाने करार केला आहे. महामंडळाने दिलेल्या मनुष्यबळाचा पगार दर महिन्याला स्मार्ट सिटी प्रशासन करीत आहे. कोरोनाची पहिली, दुसरी लाट वगळता बस सेवा शहरात सुरळीत सुरू होती. मात्र दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले त्यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. या संपाचा फटका औरंगाबाद स्मार्ट सिटी लाही बसला आहे.

शहर बस सेवेत काम करणार्‍या चालक-वाहकांना 28 आणि 29 ऑक्टोबर रोजी संपात सहभाग घेतला. त्यानंतर काही कर्मचारी कामावर रुजू झाले. 6 नोव्हेंबर पर्यंत त्यांनी कामही केले. मात्र, 7 नोव्हेंबर पासून सर्व कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याने कर्मचारी पुन्हा संपात सहभागी झाल्याने शहर बस सेवा ठप्प झाली आहे. यामुळे शहर बस सेवा ने प्रवास करणाऱ्या विद्यार्थी तसेच प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड बसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here