कमी पैशात बक्कळ नफा कमवायचाय? तर मग करा बांबूची शेती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज अनेक तरुण चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती व्यवसायाकडे वळू लागली आहेत. त्यांच्याकडून अनेक पारंपरिक पिकांना फाटा देऊन वेगळ्या पिकांचे उत्पादन घेतले जात आहे. कमी पैशात जास्त नफा देणारे पीक घेऊन झटपट श्रीमंत व्हायचे असेल तर बांबू शेती हा उत्तम पर्याय ठरू शकतो. बांबूचे झाड किमान 40 वर्षं जगू शकते. त्यामुळे एकदा लावलेल्या बांबूपासून चाळीस वर्षे उत्पन्न घेता येऊ शकते. बांबू शेती कशी करायची? याविषयी आपण जाणून घेऊया…

तसे पाहिले तर बांबू हा असा घटक आहे कि त्याचा वापर अनेक उद्योगधंद्यांत केला जातो. फर्निचर निर्मितीपासून ते अनेक कामांसाठी बांबू वापरला जातो. भारत दर वर्षी 60 दशलक्ष कोटी रुपये किमतीच्या बांबूची आयात करतो. बांबू व्यवसायासाठी जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. सुरुवातीला त्याची किंमत फक्त 2 लाख रुपये आहे. यासह, आपण कोणत्याही ऑनलाइन साइटवर आपले खाते बनवू शकता आणि बांबू उत्पादने चांगल्या किंमतीत विकू शकता.

शेतकरी मित्रांनो आज शेतीबरोबर जोडव्यवसायही करून आपण चांगले पैसे कमवू शकतो. तुम्हालाही तुमच्या शेतीत जोडव्यवसाय करायचा असेल तर चिंता कशाला करता. हॅलो कृषी हे आप मोबाईलमध्ये आजच install करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्ही अनेक प्रकारचे शेतीशी निगडित अशा पूरक व्यवसायाची माहिती घेऊ शकता. याशिवाय अनेक योजनांची माहितीही मिळवू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi डाउनलोड करा. App ओपन होताच तुम्हाला शेतीही निगडी अशा व्यवसायाची माहिती दिसेल. Hello Krushi मध्ये तुम्हाला बाजारभाव, शेतजमीन मोजणी, सातबारा उतारा, हवामान अंदाज यांसारख्या अनेक सुविधा सुद्धा पहायला मिळतील.

Bamboo

बांबू लागवडीसाठी ‘इतका’ येतो खर्च?

जसे प्रत्येक हंगामात विशिष्ट पीक घेतले जाते तसे बांबू या पिकाची शेती करण्यासाठी काहीच हंगामाची गरज भासत नाही. अन्य पिकांसाठी जसा वेळ द्यावा लागतो तसा वेळ या पिकासाठी द्यावा लागत नाही. एकदा बांबू लागवड केली, की 4 वर्षांनंतर बांबू कापणी केली जाते. बांबूच्या दोन झाडांमधील अंतर 5 फूट ठेवावे लागते. यानुसार 3 वर्षांत सुमारे 240 रुपये प्रति झाड खर्च येतो.

Bamboo

किती वर्षे राहते हे पीक?

एखाद्या पिकाची लागवड केली कि त्याचे आयुर्मान हे ठरलेले असते. ठराविक कालावधी पर्यंतच त्या पिकातून आपल्याला अनुदान घेता येते. तुम्ही 3 मीटर बाय 2.5 मीटर अंतरावर बांबूची झाडे लावली, तर एक हेक्टर क्षेत्रात सुमारे 1500 रोपांची लागवड होईल. तसेच दोन झाडांमधल्या मोकळ्या जागेत तुम्ही अन्य पिकेही घेऊ शकता. 4 वर्षांनंतर 3 ते 3.5 लाख रुपये उत्पन्न सुरू होऊ शकेल. दर वर्षी पुनर्लागवड करण्याची गरज नसते. कारण बांबूचे झाड किमान 40 वर्षं जगू शकते. त्यामुळे एकदा लावलेल्या बांबूपासून चाळीस वर्षे उत्पन्न घेता येऊ शकते.

केंद्र सरकारकडून मिळतेय प्रत्येक झाडामागे ‘इतके’ अनुदान

ज्या शेतकर्याना बांबूची शेती करायची आहे त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी केंद्र सरकारने बांबू मिशन सुरू केले आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना बांबू शेती करण्यासाठी प्रतिझाड 120 रुपये शासकीय अनुदान दिले जाते. देशात सातत्याने बांबूला मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तुम्ही बांबू शेती सुरू केली तर मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो.

Bamboo

बांबूच्या लागवड व शेतीसाठी ‘या’ योजनेतून मिळतेय सहाय्य

केंद्र सरकारने एप्रिल 2018 पासून राष्ट्रीय बांबू मिशनचे पुनर्गठण केले आहे. भारतीय वन अधिनियम 1927 मध्ये सुधारणा करून बांबूला झाड या प्रकारातून वगळण्यात आले. त्यामुळे आता शेतकर्‍यांना बांबूची लागवड, कापणी व वाहतूक करणे सुकर झाले आहे. केंद्र सरकारने बांबूच्या लागवडीला, बांबूवर आधारीत विविध उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. राज्यात बांधावर बांबू लागवडीला प्रोत्साहन मिळावे याकरिता अटल बांबू समृद्धी योजना, वनशेती उप अभियान, भरीव वृक्षारोपण अशा योजना राबविण्यात येत आहेत.