‘होऊ दे दूध का दूध…’ टाटा-एअरबस प्रकल्पावरून अजित पवारांचे सरकारला चॅलेंज!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – वेदांता प्रकल्पानंतर आता टाटा-एअरबसचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राज्यातले राजकारण आता मोठ्या प्रमाणात तापले आहे. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यावरून आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले अजित पवार?
‘8 सप्टेंबर 2021 ला केंद्र सरकारने एअरबस कंपनीसोबत करार केला होता. मग आता असं काय झालं की प्रोजेक्ट गुजरातला नेला जातोय. दरवेळी प्रकल्प गेला की हे सांगतात जाऊद्या. आपण आणखी मोठा आणू. आता तर म्हणतात हा प्रकल्प आलाच नव्हता. हे काय चाललंय?’ असा सवाल अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी उपस्थित केला.

तसेच ‘मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी समोर येऊन बोलावं. सरकारची भूमिका मांडावी. ओळीने चार प्रकल्प गुजरातला गेले. हे सगळे थांबवण्यासाठी सरकारने काहीच केले नाही का? या नाकर्तेपणाला कोण जबाबदार आहे? अशी टीकादेखील अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी केली. माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या टक्केवारीमुळे टाटा-एअरबसचा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून बाहेर गेल्याचा आरोप भाजप नेते प्रसाद लाड यांच्याकडून करण्यात आला आहे. या आरोपांवर प्रत्युत्तर देताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले याची चौकशी करा, दूध का दूध होऊ द्या. उगाच आपलं उठायचं काहाही आरोप करायचे, असे आव्हान त्यांनी दिले.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय