महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. आज ठाकरे गटाकडून उर्वरित युक्तिवाद होणार असून त्यानंतर शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करणार आहेत. खंडपीठासमोर ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत बाजू मांडणार आहे. त्यानंतर शिंदे गटाच्यावतीने जेष्ठ वकिल हरिश साळवे बाजू मांडणार आहेत.

मागील सुनावणीच्या वेळी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित करत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला होता. मागच्या सुनावणीत राज्यपालांच्या नैतिकतेवर तसेच अधिकारांवर ठाकरे गटाने युक्तिवाद केला होता. ठाकरे गटाने गेल्या सुनावणीत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर आज शिंदे गट आपली बाजू मांडणार आहे. तर त्यावेळी पदावर असणारे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यावेळी घेतलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केल्यामुळे त्यांचीही बाजू या सुनावणीमध्ये मांडण्याची शक्यता आहे. दोन्ही गटाचा युक्तिवाद झाल्यानंतर यावर निर्णय येण्याची शक्यता आहे.

मागील सुनावणी वेळी कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले होते की, शिंदेंच्या बंडानंतर तुमच्याकडे बहुमताचा आकडा नाही. बंडखोरीनंतर सरकारच्या स्थैर्यावर परिणाम होतो. या घडामोडींकडे राज्यपाल दुर्लक्ष कसं करू शकतात? त्यावर सिब्बल म्हणाले, पण हा प्रश्नच इथे कुठे उद्भवतो. ३४ किंवा ३९ लोक राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा कसा करू शकतात? राज्यपालांनी त्यांना शिवसेना म्हणून दर्जा दिला. केवळ दर्जाच दिला नाही, तर शपथही दिली आहे.