‘वुई हेट बायोलाॅजित वाॅर’ हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल : आ. बाळासाहेब पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
वाचक अन् लेखकांची संख्या वाढण्यासाठी युवा लेखक तयार होण्यासाठी प्रयत्नवादी राहिले पाहिजे. प्लेग, कोरोना असे जेव्हा केव्हा पन्नास, शंभर वर्षानी आजार, साथ येईल. तेव्हा अभयकुमार देशमुख यांचे वुई हेट बायोलाॅजित वाॅर हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.

कराड येथील अभयकुमार देशमुख यांच्या मसनवाटा व वुई हेट बायोलाॅजित वाॅर पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दै. सकाळचे सातारा आवृत्तीचे सहयोगी संपादक राजेश सोळस्कर अध्यक्षस्थानी होते. निमसोडचे माजू सरपंच मोहन देशमुख, विठ्ठलराव देशमुख, जेष्ठ पत्रकार शशिकांत पाटील, गोरख तावरे, हेमंत पवार, सचिन शिंदे, अशोक मोहने, संदीप चेणगे, विकास भोसले, पराग शेणोलकर, शरद गाडे, संतोष वायदंडे यांच्यासह पत्रकार, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले, ज्या वयामध्ये पत्रकारीता करतो. त्या वयात कांदबरी लिहीणे ही कौतुकास्पद बाब आहे. आज वुई हेट बायोलाॅजीकल वाॅर व मसनवाटा अशा दोन कादंबऱ्या प्रकाशीत करत आहोत. त्या दोन्ही कादंबऱ्यांमध्ये पिढी बदलतानाचा प्रवास लिहीला आहे. अलीकडच्या लेखक व वाचकांची संख्या घटत असलेल्या स्थितीत देशमुख यांनी चोखाळलेली वेगळी वाट कौतुकास्पद आहे. नव्या लेखकांनी तयार व्हावे, नव्या वाटा धुंडाळाव्यात त्याशिवाय इतिहास कळणार नाही. अनेक पत्रकार त्यांच्या व्यवसायात आलेले अनुभव लिहीतीत. मात्र अभयने सामाजिक भान असलेले लिखाण केले. ते कौतुकास्पद आहे. चीनमधून आला हेही खर आहे. काळजी घेतली गेली नाही. हेही समजून घ्यायला हवे. जास्त फकटा बसला. तज्ञ सांगत होते तेही एकल नाही. तीन लाख लोक घरवापसी झाली. मात्र त्या लोकांनी ऐकल नाही. योग्य यंत्रणेने कोरोनाच्या दाहकतेची माहिती दिली नसल्याने मोठे नुकसान झाले. यापुढे आता काळजी घ्यावी लागेल.

संपादक राजेश सोळसकर म्हणाले, कोरोनाचा कालवधी सर्वांसाठी अवघड व कठीण कालवधी होता. या काळात आपण अनेक जवळची माणसे गमावली. ज्या स्वतःसह कुटूबांची जबाबदारी महत्वाची होती. त्या काळात जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्विकारलेल्या आमदार बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्याला सावरले. त्याचे नेतृत्व महत्वाचे ठरले. कोरोना काळात जबाबदारी लक्षात ठेवून त्यांनी काम केले. वास्तिवक तज्ञांनाही मान्य आहे, की कोरोना चीनने जाणीवपूर्वक पसरवला. महासत्ता होण्यासाठी चीन कोणत्याही थराला जावू शकतो. त्यासाठी त्यांनी अमेरिकेला लक्ष करत त्यांची अर्थव्यवस्था खिळखिळू करण्याचा डाव आखला होता. मात्र जगभरतत कोरोनाने फार बदल घडवले. कोरोनानंतर व पूर्व अशी जगात ओळख झाली. त्याची फार मोठी किंमत मोजावी लागली. अशा संनेदनशील विषयांना हात घातला तो कौतुकास्पद आहे. अभयकुमार देशमुख यांनी प्रास्ताविक केले. संतोष गिरी व सौ. विभुते यांनी सुत्रसंचलन केले.