15 दिवसांमध्ये सरकार कोसळणार, फक्त सही बाकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे डेथ वॉरंट तयार आहे. 15 दिवसांमध्ये सरकार कोसळणार, फक्त सही बाकी आहे असं मोठं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. राऊतांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आज उद्धव ठाकरे यांची जळगावात जाहीर सभा असून त्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी हे विधान केलं आहे.

सध्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या 40 लोकांचं जे काही राज्य आहे, ते पुढील 15 ते 20 दिवसांत गडगडल्या शिवाय राहणार नाही. प्रत्येकजण आपापली गणित मांडत आहेत. आम्ही मात्र निकालाची वाट पाहतोय असं संजय राऊत म्हणाले. या सरकारचा ‘डेथ वॉरंट’ निघालेलं आहे, फक्त सही बाकी आहे असेही त्यांनी म्हंटल.

दरम्यान, एकनाथ शिंदे समजदार नेते आहे, परंतु आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, असे विधान राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले होते, त्याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, बसवा ना मग त्यांना….. देवेंद्र फडणवीस हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मनातील मुख्यमंत्री असतील तर त्यांनी फडणवीसांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधावे असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.