सरकारच्या ‘या’ तीन योजनांचा शेतकऱ्यांना होतो फायदा, आजच घ्या लाभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या देशातील 75 टक्के लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे आपले सरकार देखील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणत असतात. आणि या योजनेच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असतो. आता आपण शेतकऱ्यांच्या हिताच्या अशा तीन योजना पाहणार आहोत. ज्याचा फायदा शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. या योजनेचा लाभ घेतल्यानंतर शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक लाभ होणार आहे. आणि ते पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

पंतप्रधान पिक विमा योजना

पंतप्रधान पिक विमा योजना ही देशातील सर्वात लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सरकारकडून मदत केली जाते. जर नैसर्गिक संकट आले, पिकांना कीड लागली किंवा दुष्काळ पडला तर यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांना मदत मिळते.

किसान क्रेडिट कार्ड

किसान क्रेडिट कार्ड ही देखील शेतकऱ्यांसाठी एक खास योजना आहे. ही योजना 1998 पासून चालू झालेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 4 टक्के व्याज दराने साधारणपणे तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. आतापर्यंत जवळपास अडीच कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे.

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षाला सहा हजार रुपयांचे आर्थिक मदत सरकारकडून केली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईटला अर्ज करावा लागतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सरकारला अर्ज करावा लागतो. ही सहा हजारांची रक्कम तीन टप्प्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते.