Tilak Varma Retired Out : हार्दिक नव्हे, तर ‘या’ व्यक्तीने तिलक वर्माला रिटायर आऊट केलं

Tilak Varma Retired Out
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Tilak Varma Retired Out । लखनौ सुपरजाईंट विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियसचा 12 धावांनी पराभव झाला. २०३ धावांचा पाठलाग करताना मुंबईची पलटण १९१ धावांवरच अडकली. सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले आणि अखेर लखनौने बाजी मारली. मात्र या सामन्यात सर्वात जास्त चर्चा झाली ती तिलक वर्माची… तिलक वर्मा हा धावांसाठी संघर्ष करत होता.. त्याच्या बॅटला बॉल म्हणावा तसा लागतच नव्हता.. त्यामुळे ऐन मोक्याच्या क्षणी त्याला रिटायर आऊट करण्याचा निर्णय मुंबई इंडियन्सने घेतला… मुंबईच्या या निर्णयानंतर हार्दिक पंड्यावर टीकेची झोड सुद्धा उठवण्यात आली. परंतु टिळक वर्माला पाठीमागे पाठवण्याचा निर्णय हार्दिक पंड्याचा नव्हता, तर दुसऱ्याच व्यक्तीचा होता….

जयवर्धनेने घेतला निर्णय – Tilak Varma Retired Out

लखनौ सुपर जाईंट विरुद्धच्या सामन्यात मुंबईने तिलक वर्माला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून वापरलं… परंतु जेव्हा संघाला गरज होती तेव्हा इम्पॅक्ट पाडण्यात तिलकला अपयश आलं… तिलक वर्माने २५ धावा केल्या खऱ्या, परंतु त्यासाठी त्याने तब्बल २३ चेंडू खेळले. जेव्हा मुंबईला प्रति ओव्हर १३ धावांची गरज होती तेव्हा टिळक जवळपास १०० च्या स्ट्राईक रेटने खेळत होता. त्याचाच फटका मुंबई इंडियन्सला बसला. अखेर १९ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर तिलक वर्मा रिटायर आऊट झाला. मुंबईला त्यावेळी ७ चेंडूत जवळपास २५ धावांची गरज होती…. मात्र टिळक वर्माला रिटायर आऊट करून त्याच्या जागी मिचेल सँटनरला संधी दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या…. डगआऊट मध्ये बसलेला सूर्यकुमार यादवही या निर्णयाने हैराण झाला… हार्दिक पंड्याने चुकीचा निर्णय घेतला अशा चर्चा सर्वत्र सुरु झाल्या… परंतु तिलक वर्माला रिटायर करण्याचा निर्णय हार्दिकने नव्हे तर प्रशिक्षक महेला जयवर्धनेने घेतला होता हे नंतर समोर आलं.

महेला जयवर्धने यांनी सामना संपल्यानंतर मान्य केले की तिलक वर्माला रिटायर आऊट (Tilak Varma Retired Out) करण्याचा निर्णय त्यांचा होता. तिळक धावा काढण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला ते जमत नव्हतं. आम्ही शेवटच्या काही षटकांपर्यंत वाट पाहिली. त्याने मैदानावर थोडा वेळ घालवला होता, त्यामुळे तो त्या चेंडूंवर मोठे फटके मारू शकला पाहिजे होता. तिलक वर्मा संघर्ष करत होता. शेवटी मला वाटलं कि आता नवीन फलंदाज खेळायला आले पाहिजे… म्हणून त्याच्या ऐवजी मिचेल सँटनरला संधी दिली असं जयवर्धने म्हणाला.