… तर राज्यपालांना टकमक टोकावरून टाकून दिलं असतं; उदयनराजे संतापले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यांनतर भाजप खासदार छत्रपती उदयनराजे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाल आहे. राज्यपालांची उचलबांगडी होत नाही तोपर्यंत थांबणार नाही. इथे असते तर टकमक टोकावरून फेकून दिलं असतं असं म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

आज रायगड किल्ल्यावर जाऊन उदयनराजे यांनी निर्धार शिवसन्मानाचा या मेळाव्यात राज्यपाल आणि भाजपवर निशाणा साधला. यांनतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, सर्वच पक्षांनी सोईनुसार महाराजांच्या नावाचा वापर केला आहे. यापुढे हे चालणार नाही. राज्यपालांची उचलबांगडी जोपर्यंत होत नाही. तोपर्यंत शांत बसणार नाही. इथं असते तर राज्यपालांना टकमक टोकावरून टाकून दिले असते. राज्यपालांचा तोल गेला असता. त्यांना मी हात लावला नसता, त्यांना हात लावून मला कमीपणा आला असता असं उदयनराजे म्हणाले.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उदयनराजे याना धन्यवाद दिले आहेत. उदयनराजे यांना मी खास धन्यवाद देईल. या मुद्द्यावर भाजपमधील सुद्धा छत्रपती प्रेमी एकत्र यावेत असं त्यांनी म्हंटल.