शिवधनुष्य रावणाला पेललं नाही ते मिंध्याला काय पेलणार?? ठाकरेंचा घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवधनुष्य रावणाला पेललं नाही ते मिंध्याला काय पेलणार?? असा सवाल करत हा तर शिवसेना संपवण्याचा डाव आहे . हे जे सगळं घडतंय हा पूर्वनियोजित कट आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर केली आहे. आज शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सर्व शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते.

आज माझे नाव, पक्ष आणि चिन्ह देखील चोरले. हा पूर्वनियोजीत कट होता. हे असचं सुरू राहीलं तर येणारी लोकसभा निवडणूक शेवटची असले. त्यानंतर देशात हुकूमशाही येईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हंटल. सध्या चोरांना राजप्रतिष्ठा देण्याचा काळ सुरु आहे. पण जे शिवधनुष्य रावणाला पेललं नाही ते मिंध्याला काय पेलणार?? असा घणाघात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर केला.

निवडणूक आयोगाचा कारभार हा मेरी मर्जी याप्रमाणे चालला आहे. निवडणूक आयोगाने चुकीचा निर्णय घेतला. निवडणूक आयोग म्हणजे सुलतान नाही. निवडणूक आयोगाला घाई करण्याची गरज नव्हती, सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या केसचा गुंता वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला का ? अशी शंकाही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.