Weather Today : सध्या महाराष्ट्रावर तीन चक्रीवादळांमुळे हवामानात मोठे बदल होत आहेत. दक्षिणेकडून, पश्चिम बंगालच्या खाडीतून आणि गुजरातच्या दिशेनं चक्रीवादळाच्या स्थितीने हवामानात गडबड निर्माण केली आहे. यामुळे देशभरात अचानक उष्णतेचे प्रमाण वाढले आहे, तसेच काही ठिकाणी गारपीट देखील होत आहे. दक्षिण भारतातही काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याचा (Weather Today) इशारा देण्यात आला आहे, तर उत्तरेकडून हिटवेव आणि पावसाची दुहेरी समस्या उद्भवली आहे.
महाराष्ट्रातील काही भागांत 40 किमी वेगाने वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील हवामानात असंवेदनशील बदल होण्याची शक्यता आहे. सध्या (Weather Today) राज्यातील जवळपास 8 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अलर्ट आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल असं म्हटलं जात आहे. घराबाहेर पडताना तुम्हाला छत्री घेणं की टोपी घालणं योग्य होईल, हे तुमच्या जिल्ह्याच्या हवामानावर अवलंबून आहे.
कोकण पट्टा (Weather Today)
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये सूर्याची तीव्र झळ जाणवते आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही कोरडं हवामान असल्याने पावसाचा कोणताही इशारा नाही. आगामी पाच दिवसांत तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे, आणि तेव्हा उष्णतेची तीव्रता वाढू शकते, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
हलका पाऊस (Weather Today)
धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहील, आणि अधूनमधून हलका पाऊस होईल. परभणी, हिंगोली, आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतर जिल्ह्यांमध्ये कोरडं हवामान कायम राहील.
वादळी वाऱ्याचा इशारा (Weather Today)
22 आणि 23 मार्च रोजी महाराष्ट्रात 8 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोसाट्याच्या वाऱ्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. या भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांना अलर्ट जारी करण्यात आला असून, पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे.