Weather Update Today : मे महिन्याच्या सुरुवातीलाच भारतात हवामानाने पुन्हा एकदा नाट्यमय बदल घडवत देशभरात पावसाचं आगमन झालं आहे. उत्तर, पूर्व आणि ईशान्य भारतातील 15 पेक्षा अधिक राज्यांमध्ये जोरदार पावसासोबत वादळी वाऱ्यांचा इशारा हवामान विभागाने (Weather Update Today) दिला आहे. काही ठिकाणी गारपीट आणि आंधी-वादळ होण्याचीही शक्यता आहे.
राजधानी दिल्लीत तापमानात घट, वादळी वाऱ्यांची शक्यता
दिल्ली आणि आसपासच्या भागांमध्ये 5 मेपर्यंत हलक्यापासून जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राजधानीत वादळी वाऱ्यांसह पावसाचा सिलसिला सुरू (Weather Update Today) राहणार असून, यामुळे तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे. दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा खाली जाण्याची चिन्हं दिसत आहेत.
पश्चिमी विक्षोभ पुन्हा सक्रिय, हवामानात सातत्याने बदल (Weather Update Today)
‘स्कायमेट वेदर’च्या रिपोर्टनुसार, २ मेपासून पश्चिमी हिमालयीन भागात नवीन पश्चिमी विक्षोभ सक्रिय होणार आहे. यानंतर लगेच आणखी एक हवामान प्रणाली तयार होणार असून, त्याचा परिणाम पुढील आठवड्याभरापर्यंत दिसून येईल. त्यामुळे संपूर्ण उत्तर भारतात वाऱ्यांसह पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
पूर्व आणि मध्य भारतात ४ मेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा
ओडिशा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालसह मध्य भारतातील भागातही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा ४ मेपर्यंत देण्यात आला आहे. काही ठिकाणी ओलावृष्टीसह शेतपिकांवरही परिणाम होऊ शकतो. वीज पडण्याच्या घटनाही घडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावं, असा सल्ला देण्यात आला आहे.
७ मेपर्यंत धुळीच्या वादळाचा धोका (Weather Update Today)
राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या उत्तर-पश्चिमेकडील राज्यांमध्ये ७ मेपर्यंत वाऱ्याचा वेग वाढणार असून, धुळीच्या वादळांसह गडगडाटी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही ठिकाणी झाडं पडणे, विजेच्या तारा तुटणे अशा घटना घडू शकतात.
महाराष्ट्रात काय ?
राज्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर मराठवाडा या भागात ढगाळ वातावरण निर्माण होऊन हलक्या पावसाची शक्यता आहे.
काय काळजी घ्यावी?
- घराबाहेर निघताना हवामानाचा अंदाज तपासावा
- वीज चमकताना झाडांच्या खाली थांबू नये
- शेतकरी वर्गाने संभाव्य गारपीटीपासून पिकांचे संरक्षण करावे
- झंझावाती वाऱ्यांच्या वेळी वाहन पार्किंग सुरक्षित ठिकाणी करावी
५ मेपर्यंत संपूर्ण देशभरात हवामानात मोठे चढ-उतार होणार असून, अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा फटका बसू शकतो. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणं आणि हवामान विभागाच्या सूचना लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल.