आंबोली घाटात दुर्घटना ३३जण जागीच ठार.

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आंबोली | कोकण कृषी विद्यापीठाची मिनी बस आंबोली घाटामध्ये कोसळल्याने झालेल्या अपघातात ३३ लोक जागीच ठार झाले असून फक्त एका व्यक्तीस जीवित वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. चालका सहित गाडीत ३४ लोक बसलेले होते. पावसाळ्यात आंबोली घाटात दुसर प्रकाश असतो त्यातून असे अपघात उदभवतात.
कोल्हापूर महाबळेश्वर रस्त्यावर आंबोली घाट लागतो. घाट २० किमीचा असून गाडी कोसळलेली दरी तब्बल १२०० मीटरची आहे. घाट घनदाट झाडीने घेरलेला असल्याने रस्त्याचा अंदाज येत नाही. मृत व्यक्ती पैकी संदीप झगडे, संदीप भोसले, प्रशांत भांबडी, सुनील कदम ही चार नावे समोर आली आहेत.
स्थानिक आमदार घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी माध्यमांना ही बातमी कळवली आहे. आंबोली घाटात सतत आशा घटना घडत असतात असे स्थानिक लोकांनी सांगितले आहे. घाटातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी पुण्याहून एनडीआरएफ च्या टीमला पाचारण करण्यात आले आहे.

Leave a Comment