काश्मिर मधे फक्त २७५ दहशतवादी?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बारामुल्ला : जम्मु आणि काश्मिर मधे राज्यपाल राजवट लागू झाल्यापासून भारतीय सेनेच्या दहशतवाद विरोधी कारवायांना चांगलाच वेग आला आहे. दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी एन.एस.जी. ब्लॅक कमांडोज देखील काश्मिरमधे तैनात करण्यात आले आहेत. जम्मु काश्मिरमधील वातावरणा बद्दल बोलताना लेफ्टनंट जनरल ए. के. भट यांनी उत्तर काश्मिरमधे दक्षिण काश्मिरच्या तुलनेत शांतता असून उत्तरेत तुलनेने कमी दहशतवादी असल्याचा खुलासा केला आहे. कश्मिरमधे केवळ २७५ दहशतवादी आहेत. काश्मिरातील दहशतवाद्यामधे लष्कर ए तोयबा च्या दहशतवाद्यांची सख्या अधिक असून काश्मिरमधे आयसिस हा मोठा धोका उरलेला नाही असेही भट यांनी म्हटले आहे. कश्मिर खोर्यातील भरकटलेल्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणणे हेच आमच्या समोरील आव्हान असून आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत असेही भट पत्रकारांशी बोलताना म्हणले आहेत.

Leave a Comment