दुष्काळाचं सावट दूर होऊ दे.. असं साकडं घालत गणरायाला निरोप..!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड प्रतिनिधी | जिल्ह्यात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येतोय. घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपती विसर्जनाला सुरुवात झालीये.

परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसरात असणाऱ्या हरिहर तीर्थ या तलावात शहरातील गणपतीचे विसर्जन करण्यात येतंय. दुष्काळाचं सावट यंदाच्या विसर्जनावर दिसून आले, आज गणेश विसर्जन असल्याने परळी नगर पालिकेकडून टँकरच्या सहाय्याने हा तलाव भरण्यात आलाय.

जिल्ह्यावरील दुष्काळाचं सावट दूर होऊ दे.. आणि परतीचा पाऊस जोरदार पडू दे.. असं साकडं घालत गणरायाला निरोप देण्यात येतोय. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत गणेश विसर्ज सुरु आहे.

Leave a Comment