भेंडी बियाण्यात फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधीला शेतकऱ्यांनी शेतातच ठेवले डांबून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उस्मानाबाद प्रतिनिधी | किशोर माळी, 

तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील शेतकऱ्यांची औरंगाबाद येथील नाथ बायोजिन इंडिया लिमिटेड या बियाने कंपनीने फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.

भेंडीची लागवड करुन तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरीही भेंडीला फुले व फळे लागत नसल्यामुळे शेतकरी हवालदिक झाले आहेत.शुक्रवार दिनांक 5 जुलै रोजी भेंडी प्लॉट ची स्थळ पाहणी करण्यासाठी आलेल्या कंपनीच्या ज्योतीराम जाधव व प्रमोद झाडगावकर या दोन कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी संध्याकाळपर्यंत शेतात बसवून ठेवले. दोन दिवसांत कंपनीला अहवाल सादर करुन नुकसान भरपाई देण्याच्या हमीवर रात्री उशिरा कर्मचाऱ्यांची सुटका झाली.

दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करुन पांगरदरवाडी येथील 20 शेतकऱ्यांनी बँकेकडून व बचत गटांकडून व्याजाने पैशे घेऊन एप्रिल महिन्यामध्ये औरंगाबाद येथील नाथ बायोजिन इंडिया लिमिटेड या बियाने कंपनीच्या नाथ-05 या भेंडीच्या वाणाची लागवड केली.पाण्याची मुबलक व्यवस्था नसतानाही टँकरने पाणी घालुन शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे भेंडी जतन केली. 55 ते 60 दिवसांत शेतकऱ्यांना भेंडीच्या फळाचे उत्पन्न अपेक्षित असताना तीन महिने उलटूनही पिक आले नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.पांगरदरवाडी येथील 20 शेतकऱ्यांनी 30 एकरांवर भेंडीची लागवड केली होती.प्रति एकरी त्यांना आजपर्यंत 60 हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे.संबंधित कंपनीनेu तात्काळ नुकसान भरपाई द्यावी.व त्या कंपनीवर तात्काळ बंदी घालावी अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
औरंगाबाद येथील नाथ बायोजिन इंडिया लिमिटेड या बियाने कंपनीकडून महेश डोंगरे, लक्ष्मण जाधव, कुमार कदम, सोमनाथ जाधव, आबा गाटे, गोकुळ मते, सुनिल फंड, आनंदा कदम, लक्ष्मण कदम, नागनाथ कदम, गोविंद मोरे, धनाजी साळुंके, शंकर मोरे, बाळू चव्हाण, संजय शिंदे, सूर्यभान कदम, विश्वनाथ फंड, बाबू मोरे आदी शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे.

Leave a Comment