मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत वीज चोरी – नवाब मलिक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी ‘महाजनादेश’ यात्रेच्या निम्मिताने महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत. सध्या त्यांचा ताफा बीड जिल्ह्यामध्ये आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या महाजनादेश यात्रेच्या सभेसाठी चोरीची वीज वापरण्यात आल्याचा प्रकार समोर आला असल्याची माहिती आहे. या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि मुंबई विभागीय अध्यक्ष नवाब मलिक यांनी सडकून टीका केली आहे.

‘माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या सभेत सरकारी वीज वापरल्यामुळे त्यांची निवडणूक रद्द करण्यात आली होती. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर अशा पद्धतीने चोरीची वीज वापरली जात असेल तर वीज कंपन्यांनी तात्काळ पोलिस चौकीत गुन्हा नोंदवावा,’ असे नवाब मलिक म्हणाले.

Leave a Comment