या पोलिस अधिकाऱ्याने हिजबुलच्या दहशतवाद्यांना आपल्या घरात आश्रय दिला होता, वाचा सविस्तर..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र | जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे रविवारी तपासणी दरम्यान हिजबुल मुजाहिद्दीनच्या तीन अतिरेक्यांना अटक केली गेली होती. ज्यावेळी हे दहशतवादी पकडले गेले, त्याचवेळी जम्मू-काश्मीर पोलिस दलाचे डीएसपी देवेंद्र सिंगदेखील त्यांच्याबरोबर गाडीमध्ये होते. देवेंद्रसिंग यांची पोलिस आणि सुरक्षा संस्था चौकशी करत आहेत. दरम्यान सोमवारी सूत्रांनी सांगितले की, देवेंद्र सिंगने आपल्या घरातच दहशतवाद्यांना आश्रयदेखील दिला होता. देवेंद्रसिंगला अटक झाल्यानंतर त्यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर ही माहिती पुढे आली. छापासत्रादरम्यान एक ए के रायफल आणि दोन पिस्तूलही जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जम्मू-श्रीनगर महामार्गावर जेव्हा देवेंद्र सिंगला पकडण्यात आले होते, तेव्हा तो हिजबुल दहशतवाद्यांना काश्मीरच्या बाहेर नेत होता. श्रीनगरमधील बदामीबाग स्थित उच्च सुरक्षा विभागात देवेंद्रसिंग यांच्या घरी हे तीन अतिरेकी राहत असल्याचे तपासात पुढे आले आहे. सूत्रांनी सांगितले की, देवेंद्रसिंग यांनी शुक्रवारी दक्षिण काश्मीरमधील शोपियानहून दहशतवाद्यांना आपल्या घरी आणले आणि ते एक रात्र तिथे आश्रय घेतला. हिजबुल कमांडर नवीद बाबू आणि त्याचे दोन साथीदार इरफान आणि रफी यांनी लष्करी सेनेच्या १५ क्रमांकाच्या वाहिनीच्या मुख्यालयाला लागून असलेल्या घरात रात्री रात्र काढली. शनिवारी सकाळी ते जम्मूला रवाना झाले, तेथून ते दिल्लीला जाण्याचा विचार करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राष्ट्रपती पोलिस पदक मिळालेल्या पोलिस अधिकाऱ्याने नावेदला अनेकवेळा वेगवेगळ्या ठिकाणी नेल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या वर्षी तो त्याला जम्मू येथे घेऊन गेला. सूत्रांचे म्हणणे आहे की देवेंद्र सिंगवर दहशतवाद्यांसारखीच वागणूक मिळत आहे आणि सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांची टीम त्याची कसून चौकशी करीत आहेत. शुक्रवारी सकाळपासूनच देवेंद्रसिंग आणि नवीन बाबू यांच्या कारवायांवर नजर ठेवून होतो अशी पोलिसांनी सूत्रांनी सांगितले.

शुक्रवारी संध्याकाळी देवेंद्रसिंगने तिन्ही दहशतवाद्यांना आपल्या घरी नेले तेव्हा साध्या कपड्यांतील पोलिस आधीपासूनच त्याच्यावर लक्ष ठेवून होते, असे त्यांनी सांगितले.

२०१३ मध्ये जेव्हा संसद हल्ल्यातील आरोपी अफझल गुरूने लिहिलेल्या चिठ्ठीत असा दावा केला गेला होता की एका अधिकाऱ्याने संसद हल्ल्यातील आरोपीला दिल्लीला घेऊन जाण्यास सांगितले होते व त्याच्या मुक्कामाची व्यवस्था केली होती.

Leave a Comment