शेतकर्‍यांचे उभे पीक केले उद्धवस्त, शिवबाच्या राज्यात वनाधिकाऱ्यांचे तुघलकी वागणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी | मुघलांनाही लाजवेल असे काम कर्जत तालुक्यात वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी केले आहे. केवळ वन जमिनीवर भात लागवड केली म्हणून आदिवासींचे उभे पीक या अधिकाऱ्यांनी संगनमताने उध्वस्त केले आहे. माझ्या राज्यातील रयतेच्या गवताच्या काडीलाही धक्का लागता कामा नये अशी शिवनीती होती.

सध्याचे राज्यकर्ते उठताबसता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात आणि काम मात्र त्याच्या उलटे करतात. याचाच प्रत्यय कर्जत तालुक्यातील ओलमण भागात आला. आदिवासी बहुल भाग असलेल्या या भागातील आदिवासी शेतकरी हे येथील माळरानावर शेती करतात. मात्र शेती लावलेली जमीन ही वनखात्याची असल्याचे सांगत बहरून आलेले उभे पीक या अधिकाऱ्यांनी उध्वस्त केले. आदिवासी शेतकऱ्यांच्या हात तोंडाशी आलेला घास काढून घेतला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून अनेकांनी याचा तीव्र निषेध केला आहे.

कर्जत तालुक्यात वनखात्याचा आणि सरकारी जमिनीवर अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. अनेक ठिकाणी माती माफिया डोंगरच्या डोंगर उध्वस्त करत आहेत. दगडांच्या खाणी मुळे डोंगर नामशेष होत आहेत. या सर्व प्रकारांकडे दुर्लक्ष करून आदिवासींना आणि कष्टकरी जनतेला त्रास देणे कितपत योग्य ? हा खरा प्रश्न या प्रकरणातून पुढे येत आहे.

 

शिवबाच्या राज्यात वनअधिकाऱ्यांचे तुघलकी वागणे

इतर महत्वाच्या बातम्या –

Leave a Comment