मुंबईत १० परदेशी तबलिगींना पोलिसांनी केली अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । इंडोनेशियाचे नागरिक असलेल्या १० तबलिगींना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व १० परदेशी तबलिगींना क्वारंटाइन करण्यात आलं होतं. त्यांचा क्वारंटाइनचा कालवधी संपल्याने आता पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्यावर विविध कलमं लावण्यात आली आहेत. पीटीआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. तबलिगी जमातच्या दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये झालेल्या कार्यक्रम देशात कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्यास कारणीभूत ठरला होता. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी ही कारवाई महत्त्वाची मानली जाते आहे.

दिल्लीतल्या निजामुद्दीन मध्ये तबलिगी जमातचा जो कार्यक्रम झाला त्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढली. तबलिगी जमातने माहिती लपवून ठेवल्याचेही आरोप झाले. आता या प्रकरणातील १० परदेशी नागरिकांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या सगळ्यांचा क्वारंटाइनचा कालावधी संपल्याने ही कारवाई करण्यात आली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment