Breaking News | चीनसोबतच्या धुमश्चक्रीत भारताचे २० जवान शहीद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । भारत चीन सीमाभागात सध्या तणावाचे वातावरण आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार भारत चीन सैन्यात सीमावर्ती भागात जोरदार धुमश्चक्री झाली असून यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले आहेत. सरकारी सूत्रांच्या हवाल्याने एनआयए वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

शहीद जवानांची संख्या अजून वाढण्याची भीती आहे. याआधी एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाल्याची माहिती होती. सोमवारी रात्री भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांसमोर आले होते. यावेळी दोन्ही सैन्यांमध्ये झटापट झाली होती.

सीमेवर २० ठिकाणी सध्या तणावाची स्थिती आहे. धुमश्चक्रीत चीनचे ४३ जवान जखमी झाल्याचेही समजत आहे. तसेच चिनी हेलिकॉप्टर भारतीय सीमाभागात घिरट्या घालत असल्याची माहिती एनआयए ने दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment