२०२१ पर्यंत राज्यातील एकही व्यक्ती बेघर राहणार नाही – मुख्यमंत्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । ”२०२१ पर्यंत राज्यातील एकही व्यक्ती बेघर राहणार नाही. प्रत्येकाला सरकारच्या माध्यमातून घर बांधुन देऊन त्याला सर्व सुविधा देणार” असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शिराळा विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या भाजपाचे उमेदवार शिवाजीराव नाईक यांच्या प्रचारार्थ काल वाळवा तालुक्यातील कामेरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी आयोजित जाहीर प्रचार सभेत बोलत होते.

यावेळी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत ,खासदार संजयकाका पाटील, भाजपा उमेदवार शिवाजीराव नाईक यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विरोधकांवर जोरदार टीका करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ”राहुल गांधी हे महाराष्ट्रात येऊन सभेत बोलताना ७० वर्षे तुमच्यावर अन्याय झाला” असे सांगत आहेत. पण ते विसरले ६०  वर्षे त्यांची सत्ता होती. त्यामुळे आमचे काम राहुल गांधी करत आहेत. म्हणून मी राहुल गांधी यांचे आभार मानतो.  कारण जिथे त्यांची सभा होते तिथे आम्ही नक्की जिंकतो” असं प्रतिपादन त्यांनी केले आहे.

Leave a Comment