वर्षभरापूर्वी विवाह झालेल्या तरुणीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बनोटी : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबाद जिल्ह्यातील बनोटी याठिकाणी एका 21 वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोमवारी दुपारी घरात कोणी नसताना तिने हे टोकाचे पाऊल उचलले. या तरुणीचा १ वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. तिने अचानक केलेल्या आत्महत्येमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.

आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव स्वर्णा अंबादास जाधव असे आहे. तिचे वर्षभरापूर्वी किन्ही येथील रहिवासी असणाऱ्या अंबादास जाधव या वकिलाशी लग्न झाले होते. सोमवारी सकाळी पती वकील अंबादास जाधव सोयगाव येथील न्यायालयात गेल्यानंतर काही वेळाने घरातील अन्य सदस्य देखील शेतात गेले. यानंतर घरी कोणी नसताना स्वर्णा यांनी घरातील छताच्या कडीला साडी बांधून गळफास घेतला.

यानंतर दुपारच्या वेळी स्वर्णा यांचा पुतण्या गौरव घरी आला. तेव्हा स्वर्णा यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून त्याने आरडाओरड केली. तेव्हा गल्लीतील काहीजणांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यानी पंचनामा केला. मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर स्वर्णा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. स्वर्णा यांनी आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहिली नसल्यामुळे आत्महत्येचे नेमके काय कारण आहे हे अजून स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून या घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे.

Leave a Comment