30 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी बोनस, मंत्रिमंडळाने दिली 3714 कोटी रुपयांच्या देयकाची मान्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने 30 लाख सरकारी कर्मचारी दीपावली बोनस देण्याची घोषणा केली आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनेफिट ट्रांसफर द्वारे कर्मचार्‍यांच्या खात्यात पैसे थेट ट्रान्सफर केले जातील. त्यांनी सांगितले की, दसरा किंवा दुर्गापूजनापूर्वी केंद्र सरकारच्या 30 लाख कर्मचाऱ्यांना 3737 कोटी रुपयांच्या बोनसचे पैसे मिल्ने त्वरित सुरू होतील.

30 लाख सरकारी कर्मचार्‍यांच्या खात्यावर पोहोचणार 3714 कोटी रुपये

प्रकाश जावडेकर म्हणाले की, मंत्रिमंडळाने 2019-20 या आर्थिक वर्षासाठी प्रोडक्टिविटी संबंधित बोनस आणि नॉन-प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनसला मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा सरकारच्या 30 लाखांहून अधिक गॅझेटेड कर्मचार्‍यांना होणार आहे. यामुळे वित्तीय तिजोरीवर 3,737 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

गेल्या आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी स्पेशल फेस्टिव्हल एडव्हान्स योजना सुरू करण्याची घोषणा केली. या माध्यमातून कर्मचार्‍यांना 10 हजार रुपये आगाऊ रक्कम घेता येणार आहे.

कोविड १९ चा अर्थकारणावर होणारा परिणाम पाहून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही स्पेशल LTC कॅश स्कीम जाहीर केली. याचा फायदा केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना मिळणार आहे. या योजनेत कर्मचार्‍यांना LTA च्या बदल्यात कॅश व्हाउचर मिळतील. मात्र, 31 मार्च 2021 पूर्वी ते वापरावे लागेल. तथापि, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सरकारची काही मार्गदर्शक तत्त्वे पाळली पाहिजेत. असा विश्वास आहे की, यामुळे प्रवासाची मागणी वाढेल.

गेल्या आठवड्यात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ‘या’ घोषणा करण्यात आल्या

(1) LTA कॅश व्हाउचर योजना (LTC Cash Voucher Scheme)
(2) स्पेशल फेस्टिव्हल एडव्हान्स योजना (Special Festival Advance Scheme)

स्पेशल फेस्टिव्हल एडव्हान्स योजनेचा लाभ कोणाला मिळू शकेल
अर्थमंत्री म्हणाल्या की, सर्व केंद्रीय कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ते म्हणाले की, राज्य सरकारचे कर्मचारीही याचा लाभ घेऊ शकतात. पण राज्य सरकारला हे प्रस्ताव मान्य करावे लागतील.

पैसे कसे मिळवायचे?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचार्‍यांना रुपयांचे प्री-पेड कार्ड मिळेल, असे अर्थमंत्री म्हणाले. हे आधी रिचार्ज केले जाईल. त्याला 10 हजार रुपये मिळतील. तसेच, यावरील सर्व बँक शुल्कही सरकार उचलेल.

पैसे परत कसे द्यायचे?
कर्मचारी 10 महिन्यांत आगाऊ घेतलेली रक्कम परत करू शकतात. म्हणजेच तुम्हाला महिन्याला हजार रुपये हप्ता द्यावा लागेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment