चिंताजनक! देशात मागील २४ तासात ३३१ कोरोनाबाधितांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशची वाटचाल लॉकडाऊनकडून अनलॉक होण्याच्या दिशेने होत असताना कोरोना रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मागील 24 तासांत 9987 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 331 लोकांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, देशात एकूण रूग्णांची संख्या 2 लाख 66 हजार 598 वर पोहोचली आहे.

तर दिलासा देणारी एकमेव बाब म्हणजे मागील 24 तासांत सुमारे 5 हजार लोक बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 1 लाख 29 हजार 214 झाली आहे. सध्या देशात 1 लाख 29 हजार 917 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 1 लाख 41 हजार 682 लोकांची कोरोना टेस्ट घेण्यात आली असून आतापर्यंत 49 लाख 16 हजार 116 लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.

कोरोनाचा सर्वाधिक कहर हा महाराष्ट्रात पाहायला मिळतो आहे. येथे एकूण रुग्णांची संख्या 88 हजारांच्या पुढे गेली आहे तर 3169 लोकांचा मृत्यू देखील झाला आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 2553 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 109 लोकांचा मृत्यू झाला. तर 40 हजार 975 लोकं आतापर्यंत बरे झाले आहेत. राज्यात आता 44 हजार 374 रुग्ण उपचार घेत आहेत.

दिल्लीमध्ये सोमवारी एक हजाराहून अधिक नवीन रुग्ण वाढले तर 17 लोकांचा मृत्यू झाला. दिल्ली सरकारने जाहीर केलेल्या हेल्थ बुलेटिनमधील डेथ ऑडिट कमिटीच्या अहवालाच्या आधारे, 30 मे ते 6 जून या कालावधीत 62 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची उशिरा नोंद झाली आहे. एकूण रूग्णांची संख्या ३० हजारांच्या जवळपास असून 874 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तामिळनाडूमध्ये रुग्णांची संख्या 33 हजार 229 वर गेली असून 286 लोकांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमधील रूग्णांची एकूण संख्या 20 हजारांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत 1249 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत येथे 480 रुग्णांची वाढ झाली असून 30 लोकांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment