4 फेब्रुवारी 1670 : ‘गड आला पण सिंह गेला’, कोंढाणा जिंकण्याचा रोमांचक इतिहास, वाचा सिंहगडाचा इतिहास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : 4 फेब्रुवारी 1670 च्या रात्री. म्हणजे, अगदी 350 वर्षांपूर्वी 4 फेब्रुवारी 1670 च्या रात्री पुण्यातील सिंहगड (तत्कालीन कोंढाणा) किल्ल्यावर विजय मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांचा विश्वासू सरदार तानाजी मालुसरे आणि मुघल सम्राट औरंगजेबचा किल्लेदार उदय भान राठोड यांच्यात युद्ध झाले.

पुणे शहरापासून 40 कि.मी. अंतरावर असलेल्या सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये वसलेला ऐतिहासिक सिंहगड किल्ला 2000 वर्ष जुना आहे. हा किल्ला समुद्र किनाऱ्यापासून साडेसातशे मीटर उंचीवर आहे. सिंहगडाच्या या लढाईवर नुकताच प्रदर्शित झालेल्या तानाजी मालुसरे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशस्वी झेंडा फडकावला.

काय आहे सिंहगडाचा इतिहास?

1670 मध्ये, दिल्लीमध्ये मुघल सल्तनतचा विजयाचे वारे जोरात वाहत होते. दिल्लीच्या सिंहासनावर मुघल बादशहा औरंगजेब यांनी राज्य केले. औरंगजेबाला हा किल्ला 1665 मध्ये मोगल साम्राज्य आणि शिवाजी यांच्यात पुरंदरच्या तहात मिळाला. यासह, असे आणखी 23 किल्ले देखील मोगलांना या तहात मिळाले. हा तह शिवाजी महाराजांना सलत होता. हा किल्ला पुन्हा परत घेण्याचा त्यांचा सतत प्रयत्न होता.1670 मध्ये, मोघल साम्राज्याचा विश्वासू राजपूत सेनापती उदयभान राठौड सामरिक आणि राज्य करण्याच्या दृष्टीने महत्वाच्या अशा कोंढाणा किल्ल्यावर किल्लेदार म्हणून कार्यरत होता. कोणत्याही परिस्थितीत हा महत्वाचा किल्ला परत मिळवायचा यासाठी शिवाजी महराज प्रयत्नशील होते. आणि अखेर तो मुहूर्त ठरला.

सिंहगडची लढाई 350 वर्षांपूर्वी घडली

ऐतिहासिक स्त्रोत आणि आख्यायिकेनुसार जानेवारी 1670 मध्ये तानाजी मालुसरे मुलगा रायबाच्या लग्नाची तयारी करत होते. शिवाजी महाराजांना लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी जेव्हा ते आले तेव्हा त्यांना कळले की शिवाजी महाराज सिंहगड जिंकण्यासाठी रणनीती आखत आहेत. याच वेळी मालुसरे यांनी घोषणा केली, ‘आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे’

तानाजी मालुसरे आपला भाऊ सूर्याजी मालुसरे यांच्यासह सिंहगडच्या विजयासाठी निघाले, पण हे युद्ध अत्यंत कठीण होते. सिंहगड किल्ला डोंगरावर सरळ चढणीवर वसलेला होता. या चढाईवर मोगल सैनिकांना चकवा देणे आणि विजय मिळवणे जवळजवळ अशक्य होते. रात्री तानाजी मालुसरे आपल्या सैनिकांसह गडावर चढू लागले. असे म्हणतात की, तानाजीचे भाऊ आपल्या सैन्यासह गडाच्या कल्याण गेटवर पोहोचले आणि दार उघडण्यासाठी थांबू लागले. उदयभान राठोड यांना या हल्ल्याची माहिती मिळताच भयंकर युद्ध सुरू झाले.

यावेळी तानाजीच्या काही सैनिकांनी कल्याण दरवाजा आतून उघडला. मग मराठा सैनिक आत आले आणि भयंकर युद्ध सुरू झाले.

तानाजी आणि उदयभान यांच्यात घणाघाती युद्ध झाले. मावळ्यांची संख्या कमी झाल्यानंतरही तानाजीच्या मावळ्यांनी धैर्याने युद्ध सुरु ठेवले. उदयभानशी लढताना तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले. दरम्यान तानाजीचा भाऊ सूर्याजीने खचून न जाता संपूर्ण शक्ती पणाला लावली आणि अखेर कोंढाण्यावर भगवा फडकवला. कोंढाण्यावर शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी विजय मिळविला असला तरी मोगलांच्या सैनिकांशी लढताना शूरवीर तानाजीला वीरमरण आले.

तानाजी मालुसरे यांच्या मृत्यूची आणि कोंढाणा सर केल्याची बातमी कळताच शिवाजी महाराज म्हणाले, गड आला पण सिंह गेला. तानाजी मालुसरे यांच्या या शौर्यानंतर कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे झाले.

Leave a Comment