१२ ऑगस्ट पर्यंतची बुक झाली ४५ हजार रेल्वे तिकिटे; ३ मे नंतर ट्रेन सुरु होणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वेमध्ये दुसरा लॉकडाऊन जाहीर झाल्याच्या दिवशी म्हणजे १४ एप्रिलपासून तिकिटांचे बुकिंग थांबविण्यात आले आहे. त्यावेळी १२ ऑगस्टपर्यंत सुमारे ४५ लाख रिजर्वेशन तिकिटे बुक होती.रेल्वेचे एडव्हान्स रिजर्वेशन पीरियड एआरआरपी १२० दिवस आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज कोरोनाची सुमारे १५०० नवीन प्रकरणे समोर येत आहेत आणि देशभरात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या ३०,००० इतकी आहे. अशा परिस्थितीत ३ मेनंतर रेल्वे सेवा सुरू होईल अशी आशा आहे.

२२ मार्च रोजी जनता कर्फ्यूपासून रेल्वेने ३१ मार्च पर्यंत सर्व गाड्या रद्द केल्या होत्या, त्यावेळी संपूर्ण देशात कोरोनाची सुमारे ४०० प्रकरणे होती. त्यानंतर रेल्वेच्या प्रवासी गाड्या सतत बंद ठेवण्यात आल्या आहेत. तथापि, काही राज्ये अशी मागणी करीत आहेत की इतर राज्यात अडकलेल्या मजुरांसाठी गाड्या पुन्हा सुरु कराव्यात. परंतु यासंदर्भात कोणताही निर्णय केंद्र सरकार घेईल आणि त्यांच्या निर्देशानंतरच रेल्वे काही पाऊलं उचलतील.

आकडेवारीनुसार, रेल्वेच्या तिकिटावर सरासरी १.८ प्रवाश्यांची नोंद झाली आहे. म्हणजेच १२ ऑगस्टपर्यंत ८० लाखाहून अधिक लोक रिजर्वेशन तिकिटे घेऊन प्रवासाची वाट पहात आहेत. तथापि, रेल्वेमध्ये रिजर्वेशनच्या तिकिटावर सुमारे दहा टक्के प्रवासी प्रवास करतात. अशाप्रकारे, एका मतानुसार १२ मे पर्यंत एकूण १० कोटी प्रवासी प्रवासाची प्रतीक्षा करत आहेत. तथापि, ही आकडेवारी रेल्वेच्या सरासरीपेक्षा कितीतरी पटीने कमी आहे आणि सरासरी दररोज २५ दशलक्ष प्रवासी रिजर्वेशन च्या तिकिटावरुन प्रवास करतात. परंतु रेल्वेच्या दृष्टीने या हंगाम लीन पीरियड असतो ज्यात लोकं होळी, दिवाळी, छठ हिवाळ्याच्या सुटीपेक्षा कमी प्रवास करतात. दुसरीकडे, कोरोनाच्या भीतीमुळे बहुतेक लोक या वेळी प्रवास करण्याच्या बाजूने नाहीत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment