राज्यपाल भगतसिंग कोशारींच्या ताफ्यातील गाडीला अपघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यातील 3 गाड्यांचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. भगतसिंग कोश्यारी आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी नरसी नामदेवकडे जाताना त्यांच्या ताफ्यातील 3 गाड्यांना अपघात झाला आहे. या अपक्षातात 3 गाड्यांचं किरकोळ नुकसान झाल्याची माहिती मिळतेय.

राज्यपाल भगतसिंग कोशारी हे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात दौरा करत आढावा घेत आहेत. याचवरून राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यात वादही झाला होता. परंतु मी संविधानातील अधिकारांचा वापर करून दौरे करत आहे असं प्रत्युत्तर राज्यपालांनी दिलं होतं.

राज्यपाल सध्या नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान राज्यपालांनी आज हिंगोली जिल्ह्यातील सर्व कार्यालयीन प्रमुखांची बैठक घेत सोयी सुविधा, सिंचन, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था याबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली.

Leave a Comment