आजपासून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बेवारस वाहनांवर कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आलेली भंगार वाहनांमूळे वाहतूक कोंडी आणि वाहन चालवण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामूळे या वाहनावर कारवाईचे आदेश काही दिवसांपूर्वी प्रशासकांकडून देण्यात आले होते. आता या आदेशाची अंमलबजावणी आजपासून करण्यात येणार आहे.

आज पासून दोन क्रमांक एक पासून या मोहिमेला सुरुवात करण्यात येणार आहे. ही मोहीम महापालिकेने हाती घेतली असून महिनाभर ही मोहीम राबवण्यात येणार आहे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मुख्य रस्त्याच्या कडेला बेवारस वाहने उभी केलेली आढळतात.
या भंगार बिनकामी वाहनांवर सात दिवसांची नोटीस लावण्यात येईल आणि सात दिवसानंतर वाहने उचलली नाही तर महानगर पालिकेकडून वाहने जप्त केली जाणार असल्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले होते. यापैकी काहींनी ही वाहने हटवली परंतु अद्याप 279 बेवारस वाहने उभी आहेत. असे यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता डिके पंडित यांनी सांगितले.

महापालिका यांत्रिकी विभाग, अतिक्रमण हटाव विभाग, पोलीस, आरटीओ यांच्यावतीने ही कारवाई आजपासून करण्यात येणार आहे. निहाय झोन क्रमांक एक 48, झोन क्रमांक दोन 99, झोन क्रमांक तीन 6, झोन क्रमांक चार 18, झोन क्रमांक पाच 22, झोन क्रमांक सहा 5, झोन क्रमांक सात 28, झोन क्रमांक आठ 14 झोन क्रमांक नऊ 37 या ठिकाणी एवढे बेवारस वाहने उभी आहेत.

Leave a Comment