…तर आदित्य ठाकरेंसह आघाडीचे तीन मंत्री जेलमध्ये असते; नितेश राणेंचा पवारांना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रावादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहीत पवार यांनी शक्ती कायदा कधी अस्तित्वात येणार? असा प्रश्न काही दिवसांपूर्वी उपस्थित केला होता. त्यावर आता प्रतिक्रिया देताना नितेश राणे (Nitesh Rane) यांनी टोला लगावला आहे. शक्ती कायदा अमलात आला असता तर आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीचे तीन मंत्री जेलमध्ये गेले असते असा टोला त्यांनी (Nitesh Rane) यावेळी लगावला.

काय म्हणाले नितेश राणे ?
शक्ती कायद्यावर कोणीच बोलत नसल्याचा आरोप रोहीत पवार यांनी केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना हा कायदा महाविकास आघाडीच्या सरकारच्यावेळी आला असता तर त्यांच्या सरकारमधले दोन ते तीन मंत्री जेलमध्ये गेले असते. अगदी आदित्य ठाकरे देखील आत गेले असते अशी टिका नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली आहे. रोहीत पवारांनी या कायद्याविषयी आधी समजुन घ्यावं. अमेझॉनच्या अलेक्सासारखं त्यांनी बोलू नये.

महाविकासआघाडीचे दोन मंत्री आधी आत टाकू
आपण पहिल्यांदाच आमदार झाला आहात. पवार साहेबांकडुन काहीतरी शिखावं. पवारसाहेब कसं मोजकच बोलतात आणि करायचं ते करुन टाकतात. हा वेगळ्या प्रकारचा पवार दिसतोय, जो सगळीकडे तोंड घालतो असा खोचक टोलादेखील नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आमदार रोहित पवार यांना लगावला.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या