लवासाबाबत आदित्य ठाकरेंनी सरकारची भूमिका स्पष्ट करावी; आशिष शेलार यांनी मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  लवासा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ‘ही राष्ट्रीय संपत्तीची लूट असून यात पवार कुटुंबीयांचा सक्रिय सहभाग असल्याबाबत गंभीर ताशेरे ओढले. हाच धागा पकडून भाजप आमदार आशिष शेलार यांनी याप्रकरणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे.

आशिष शेलार म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाने लवासा बाबत काही निरीक्षणे नोंदवली. न्यायालयाचा हा निकाल, निष्कर्ष आणि निरीक्षणे राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांनी वाचली असतील, अशी अपेक्षा आहे. न्यायालय म्हणते की लवासमध्ये राजकीय मनमानी आहे, सत्तेचा दुरूपयोग आहे, प्रशासकी हलगर्जीपणा आहे. पवार कुटुंबीयांचा सक्रिय सहभाग आहे. तसेच राष्ट्रीय संपत्तीची लूट आहे. या कामात पारदर्शकतेचा अभाव आहे.

लवासाची संकल्पना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आहे, व्यक्तीगत स्वारस्य खासदार सुप्रिया सुळे यांचे आहे तर कर्तव्य निभावताना हजगर्दीपणा म्हणून परवानग्यांमध्ये निष्काळजीपणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. शेतक-यांच्या जमिनींचे विषय अजूनही प्रलंबित आहेत. त्यामुळे या विषयाकडे सरकारचे लक्ष आहे का, या विषयाशी संबंधित असलेले मंत्री आदित्य ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी आमची मागणी आहे असे आशिष शेलार यांनी म्हंटल.

Leave a Comment