युवाशक्तीने पुनरुज्जीवीत झाली विदर्भ पर्यावरण परिषद

विदर्भ पर्यावरण परिषदेत तरुणाई मोठ्या उत्साहाने आणि जोमाने सहभागी झाली.

महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या, एनसीआरबीच्या अहवालात समोर आली बाब

सरकारी धोरण आणि निसर्गाच्या लहरी कचाट्यात सापडून देशात शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र सुरूच आहे. शेतमालाला मिळणारा अनियमित भाव आणि दुष्काळ यातून देशातील शेतकरी आर्थिक विवंचनेतून शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढतच आहे. याचा पुरावाच नुकत्याच जाहीर झालेल्या नॅशनल क्राइम ब्युरो रेकोर्ड्सच्या अहवालाने दिला आहे. या अहवालानुसार देशात सन २०१८ मध्ये देशभरात १० हजार ३४९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात दुर्दैवाची बाब म्हणजे या अहवालातून महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असल्याचे समोर आले आहे.

मला शेतकऱ्यांना चिंतामुक्त करायचंय – उद्धव ठाकरे

औरंगाबाद प्रतिनिधी । शेतकऱ्यांना कर्जमुक्त मी नक्कीच करणार, पण कर्जमुक्त झाल्यानंतर त्याला मला चिंतामुक्त करायचं आहे असे विधान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज व्यक्त केले. ‘अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो-२०२०’ येथे आज मुख्यमंत्री यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उद्योजकांना आम्ही प्रोत्साहन देतो,तुम्ही आमच्या भूमिपुत्रांना प्रोत्साहन द्या आणि असं जर झालं तर मराठवाडा, महाराष्ट्र, संपूर्ण हिंदुस्थान … Read more

शेतकरी आत्महत्येला शरद पवारच जबाबदार – रघुनाथदादा पाटील

सोलापूर प्रतिनिधी । शरद पवार जसे चांगल्या कामाचे श्रेय घेतात तसेच अपयशाची जबाबदारी घेणेही गरजेचे असल्याचं मत शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी केलं आहे. चांगल्या कामाचे श्रेय आम्ही त्यांना देवू मात्र शेतकरी आत्महत्यांचीही जबाबदारी त्यांनी स्विकारावी असं पाटील म्हणाले आहेत. पुढे बोलताना पंडित जवाहरलाल नेहरूंपासून नरेंद्र मोदींपर्यंत सर्वच राज्यकर्त्यांनी शेतकरी विरोधी धोरणे राबविल्याची टीका त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले कि, शेतकरी कर्जबाजारी होण्याचं मुख्य कारण हे शेतमालाला न मिळणार भाव आहे. अमी कारण म्हणजे याबाबतच सरकारी धोरण. जोपर्यंत सरकार शेतमालाच्या भावाबाबत धोरण बदलत नाही शेतकरी विरोधी कायद्यात बदल करणार नाही तोपर्यंत शेतकरी कर्जबाजारी राहणार आहे. राज्यात नवीन सरकार आलं असलं तरी केवळ चेहरे बदलले आहेत सरकार तेच आहे. तरी सुद्धा यासरकाराला शेतकरी धोरणात बदल करण्यासाठी भाग पडण्याची भूमिका शेतकरी संघटनेनं घेतली आहे. रघुनाथ पाटील यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्रच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकिंग बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 8080944419 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा Hello News

विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गंगाखेड -परभणी रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन

प्रादेशिक आर्थिक भागीदारीचा करार केंद्र सरकारने स्वीकार करू नये तसेच जिल्ह्यातील खरीप पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ वाटप करावी या व इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बुधवारी परभणी गंगाखेड रस्त्यावरील जुन्या टोलनाक्याजवळ रस्ता रोको केला. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे वाहतूक खोळंबली होती. केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देशातील शेतकरी संघटनांची मोट बांधत ग्रामीण भारत बंद ची हाक दिली होती .यात स्थानिक संघटनेच्यावतीने परभणीत बुधवार आज ८ जानेवारी रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले
.

ऑस्ट्रेलियात 10,000 उंटांना ठार मारण्याचा आदेश; उंटांमुळे वाढत आहे ‘ग्लोबल वॉर्मिंग’, जाणून घ्या काय आहे प्रकरण

कॅनबेरा | दक्षिणेकडील ऑस्ट्रेलियात पाण्याच्या कमतरतेमुळे आणि जागतिक तापमान वाढीमुळे 10,000 जंगली उंटांना ठार मारण्याचा आदेश देण्यात आला आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या अनंगू पिटजंतजतारा यानकुनीत्जतजारा म्हणजे एपीवायच्या आदिवासी नेत्याने हा आदेश दिला आहे. या आदेशानुसार काही व्यावसायिक नेमबाज दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये हेलिकॉप्टरद्वारे 10,000 हून अधिक जंगली उंटांना मारणार आहेत. पाण्याची कमतरता डेली मेलच्या अहवालानुसार दक्षिणेकडील ऑस्ट्रेलियातील लोक सतत … Read more

जयंत पाटलांकडे जलसंपदा खाते आल्याने सांगली जिल्ह्यातील सिंचन योजना पूर्ण करण्याचे आव्हान

राज्याचे जलसंपदा खाते जयंत पाटील यांच्याकडे आल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा पल्लवीत झाल्या असून ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ, वाकुर्डे या योजनांच्या पुर्ततेला आता गती येईल. जतच्या ४२ गावांचा प्रश्न मार्गी लागले, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. राजारामबापूंच्या पावलावर पाऊल ठेवून ते या योजनांसाठी ५ हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देतील, असा विश्वास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटतो.

शिवारच मोकळं पडल्यावर शिवथाळी आणणार कोठून? राजू शेट्टींचा सवाल

शिवारात पिकवणाऱ्या शेतकऱ्याकडे पहिला बघा जर शेतकऱ्यांचे शिवारच मोकळं पडलं तर शिवथाळीमध्ये अन्न आणणार कोठून शेवटी आयातच करावं लागेल अशा शब्दात राजू शेट्टी यांनी खरमरीत टीका केली.

दोन लाखांवरील कर्ज असणाऱ्यांचाही सवलतीसाठी विचार करू- बाळासाहेब पाटील

नवनिर्वाचित सहकार मंत्री आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचे कराड शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कराड उत्तर मतदारसंघाला ३० वर्षानंतर मंत्रीपद मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.

सात-बारा कोरासाठी ८ जानेवारीला महाराष्ट्र बंद, राजू शेट्टींचा इशारा

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. पण अद्याप ते पूर्ण झालेले नाही. राज्याने दिलेली कर्जमाफी तकलादू आहे. सरकार कुणाचेही असो शेतकऱ्यांचे प्रश्न सुटल्याशिवाय गप्प बसणार नाही. संपूर्ण कर्जमाफी, शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधासाठी ८ जानेवारीला महाराष्ट्र बंद ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते … Read more