सरपंच कशाला? राष्ट्रपती आणि मुख्यमंत्रीही जनतेतूनच निवडा; अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज बारामती येथील कार्यक्रमांना उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारने सरपंच, नगराध्यक्ष पदाच्या निवडीच्या घेतलेल्या निर्णयावरून निशाणा साधला. “जनतेतून फक्त नगराध्यक्ष आणि सरपंचच कशाला? राष्ट्रपती आणि मुख्यमंत्रीही थेट जनतेतूनच करावा. फडणवीस व शिंदे या दोघांच्या मंत्रीमंडळाला खूप घाई झालेली दिसते,” अशी टीका पवार यांनी केली.

अजित पवार यांनी आज बारामती येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, 1967 मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती केली, त्यांनी ही धोरणे ठरवली, तेही दूरदृष्टीचेच नेते होते. बहुमत ज्या पक्षाला असते, त्यांचे खासदार पंतप्रधान ठरवतात. राज्यातही 145 आमदारांचा पाठिंबा असलेले मुख्यमंत्री होतात, त्याच पध्दतीने याही निवडी होत होत्या. तशाच पध्दतीने नगराध्यक्ष व सरपंचपद निवडले गेले असते, तर बरे झाले असते. सरपंच व नगराध्यक्ष इतर विचारांचे असतील, तर काय होते याचा अनुभव यापूर्वी घेतला आहे.

अधिकाराचे केंद्रीकरण ही बाब लोकशाहीला घातक आहे. ज्यांच्याकडे मसल व मनी पॉवर आहे, असेच लोक निवडणूक जिंकू शकतात. विधीमंडळात हा मुद्दा मांडून चर्चा करुन ज्या सूचना येतील, त्यांचा विचार करुन मगच निवडीचा निर्णय घ्यायला हवा होता. प्रत्यक्षात तसे काही घडले नाही, असे अजित पवार यांनी म्हंटले.

Leave a Comment