उत्तर प्रदेशातील साधुंच्या हत्येनंतर राजकीय प्रतिक्रियांना सुरुवात; कोण, काय म्हणाले?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये दोन साधुंची हत्या प्रकरण समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया समोर येत आहेत. काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या घटनेचं राजकारण न करण्याचं आवाहन केलं आहे. प्रियांका गांधी यांनी या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या कायदे-व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तर दुसरीकडे अखिलेश यादव यांनीही या प्रकरणाचं राजकारण न करण्याचा सल्ला दिला. ट्विटरच्या माध्यमातून या सर्वानी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

साधूंच्या हत्येनंतर प्रियांका गांधी यांनी उत्तरप्रदेशातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ट्विट केलं. ”एप्रिलच्या पहिल्या १५ दिवसांत उत्तर प्रदेशात १०० जणांची हत्या झाली. तीन दिवसांपूर्वी एटामध्ये पचौरी कुटुंबाच्या ५ जणांचे मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळले. त्यांच्यासोबत काय घडलं? हे कुणालाही ठावूक नाही. आज बुलंदशहरात एका मंदिरात झोपलेल्या साधुंची क्रूर हत्या करण्यात आली. अशा गुन्ह्यांची चौकशी व्हायला हवी. तसंच या घटनेचं कुणाकडूनही राजकारण होता कामा नये. निष्पक्ष चौकशी करून सत्य सर्वांसमोर मांडण्याची गरज आहे. ही सरकारची जबाबदारी आहे”असं ट्विट प्रियांका गांधी यांनी केलं.

उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं कि, ”’उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात मंदिर परिसरात दोन साधुंच्या निर्घृण हत्या निंदनीय आणि दुखद आहेत. या प्रकारच्या हत्यांचं राजकारण होता कामा नये, यामागच्या हिंसक मनोवृत्तीच्या मूळ कारणं शोधून काढण्याची आवश्यकता आहे.” तर इकडे महाराष्ट्रात उत्तर प्रदेशातील साधूंच्या हत्येचं पालघरप्रमाणे राजकारण करू नका. देश कोरोनाशी लढत आहेत. मुख्यमंत्री आदित्यनाथ हल्लेखोरांवर कठोर कारवाई करतीलच, असा उपरोधिक टोला राऊत यांनी ट्विटवरून भाजपला लगावला आहे.

राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं कि, ”उत्तर प्रदेशातील बुलंद शहरातील मंदिरात दोन साधूची हत्या झाली आहे. हे अत्यंत निघृण आणि अमानुष आहे. पण सर्व संबंधितांनी या विषयाचं पालघरप्रमाणे राजकारण करू नये. देश करोनाशी लढत आहे. शांतता राखा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतीलच,” असा चिमटा राऊत यांनी काढला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment