भारतीय रेल्वेने जाहीर केल्या ‘या’ २० सूचना; तिकीट बुक करण्याआधी वाचायलाच हवं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोनाच्या संक्रमणास आळा घालण्यासाठी सुरु असलेला लॉकडाऊन आता आणखी वाढवण्यात आला आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या या चौथ्या टप्प्यामध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळावा म्हणून भारतीय रेल्वेने काही विशेष गाड्या सुरु केल्या आहेत. मात्र, आत्तापर्यंत या गाड्यांची सेवा सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे चालू केलेली नाही. रेल्वेने १२ मेपासून दिल्ली ते देशातील वेगवेगळ्या राज्यात १५ जोड्गाडय़ा चालू केलेल्या आहेत. दरम्यान, केंद्राने हे देखील स्पष्ट केले आहे की ३१ मे पर्यंत कोणतीही ट्रेन किंवा हवाई सेवा सामान्यपणे सुरू करता येणार नाही. सध्या चालणार्‍या या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचनाही केल्या गेल्या आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात …

रेल्वेच्या या २० मार्गदर्शक सूचना
– आरक्षित तिकिटे ऑनलाईन प्रक्रियेद्वारे केवळ IRCTC वेबसाइट www.irctic.co.in किंवा IRCTC Rail Connect मोबाइल अ‍ॅपद्वारे बुक करता येतील.

– रेल्वे स्थानकांच्या आरक्षणाच्या काउंटरवरुन तिकीट बुक होणार नाही.

– प्रवाशांना RAC तिकिटे दिली जाणार नाहीत किंवा प्रवासादरम्यानही कोणतीही तिकिटे दिली जाणार नाहीत.

– प्रवाशांना प्रवास सुरू होण्याच्या ९० मिनिटांपूर्वी स्टेशनवर पोहोचणे बंधनकारक असेल.

– कोरोनाची लक्षणे आढळली नाहीत तरच प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल.

– जर ताप, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर रेल्वे कर्मचार्‍याशी त्वरित संपर्क साधा.

– स्टेशनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी फेस मास्क आणि संपूर्ण प्रवासात फेस कव्हर असणे बंधनकारक आहे.

– सर्व प्रवाश्यांनी आरोग्य सेतु हे अ‍ॅप डाउनलोड केलेच पाहिजे.

– हात धुवून नियमितपणे अल्कोहोल-आधारित सॅनिटायझर वापरा.

– प्रवासी त्यांच्याबरोबर अन्न आणि पाणी घेऊन यावे.

– प्रवाशांना किमान सामान घेऊन प्रवास करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे.

– वापरलेला मास्क फक्त झाकण असलेल्या डस्टबिनमध्येच फेकला पाहिजे.

– इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर प्रवाश्यांनी राज्या सरकारने जाहिर केलेल्या प्रोटोकॉलचे पालन केले पाहिजे.

विशेष गाड्यांमध्ये ३ लाख तिकिटे आरक्षित केली
रेल्वेने १२ मेपासून विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. आतापर्यंत या गाड्यांमध्ये ३ लाख प्रवाश्यांनी तिकिटे बुक केली आहेत. रेल्वेच्या म्हणण्यानुसार पीआरएसअंतर्गत आतापर्यंत ५० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की लॉकडाऊनमुळे रेल्वेचे कर्मचारी वेगवेगळ्या राज्यात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी विशेष गाड्यादेखील चालवत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment