छत्रपती शिवराय यांच्या एकेरी उल्लेख प्रकरणी अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । ”कोणत्याही प्रकारचा अनादर व्यक्त करण्याचा हेतू  नव्हता… यात भावना दुखावल्या गेल्या असल्यास दिलगीरी व्यक्त करतो…” असे ट्विट करत अमिताभ यांनी याबाबत माफी मागितली.  काल  या प्रकरणावर चहू बाजूने टीका होत असतांना अमिताभ यांनी बिनशर्त माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकला आहे.

काय होत प्रकरण –
सोनी टीव्ही वर सुरु असलेल्या ‘कौन बनेंगा करोडपती’ (केबीसी) या शो दरम्यान विचारण्यात येणाऱ्या  प्रश्नामध्ये ”मुघल सम्राट औरंगजेबाच्या  समकालीन खालीलपैकी कोणता राज्यकर्ता होता…?” असा प्रश्न केबीसीच्या प्रश्न पटलावर आला तेव्हा त्यात दिलेल्या पर्यायांमध्ये ‘शिवाजी महाराज’ यांचा नुसता ‘शिवाजी’ म्हणून उल्लेख यामध्ये केला असल्याने या शो वर सध्या मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

त्यामुळे राज्यभरातून यावर प्रचंड टीका झाली होती .

का झाली होती टीका…? 

ज्यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य व औरंगजेबाच्या जुलमी राजवटीच्या विरोधात घालवले, अशा महान राजाचा उल्लेख एकेरी व ज्याने जुलूम व अत्याचार करत जनतेला वेठीस धरले त्याचा उल्लेख ”मुघल सम्राट” करण्यात आल्यामुळे या शो वर सध्या प्रचंड टीका होत आहे.


 

Leave a Comment